आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.
Showing posts with label राष्ट्ररक्षण. Show all posts
Showing posts with label राष्ट्ररक्षण. Show all posts

Sunday, December 1, 2013

तुम्ही गुन्हेगार आहात !

सर्व धर्म समान आहे का ? सर्वधर्मसमभाव हिंदु समाजावर का लादता ? सर्व धर्म समान आहेत, असे सांगता ? या विश्वात कोणत्याही दोन गोष्टी पूर्णपणे समान नाहीत. दोन वस्तू वा माणसांत भेद असायलाच हवा. त्याविना त्यांचे वेगळे अस्तित्व कसे असू शकेल ? कोणतीही दोन माणसे पूर्णतः एक असूच शकत नाहीत. मग सर्व धर्म समान कसे असू शकतील ? हा प्रश्नच मस्तकात मेंदू नसल्याचे लक्षण आहे'.

मॅट्रिकच्या (पूर्वीच्या दहावीच्या) मराठीच्या पाठ्यपुस्तकात ‘दोन शब्दांत दोन संस्कृती', असा एक पाठ आम्ही पाहिला. श्रुति-स्मृति-पुराणोक्त ही एक संस्कृती आणि विज्ञाननिष्ठ प्रणाली (up-to-date) ही दुसरी संस्कृती. बुद्धीवादी आणि विज्ञाननिष्ठ प्रणालीचे अनुसरण केले पाहिजे. श्रुति-स्मृति पुराणोक्त धर्माचे आता दफन झाले पाहिजे, असा त्या विधानाचा आशय या पाठातून व्यक्त होतो. श्रुति-स्मृति पुराणोक्त ही संस्कृती अबुद्धीवादी आहे का ? विज्ञानविरोधी आहे का ? 

आमचे राष्ट्र आणि समाज यांचे लक्षावधी वर्षांपासून मंतरलेल्या अभेद्य कवचासारखे संरक्षण करणार्या भारतीय वेशभूषा, केशभूषा, खाणे, पिणे, चालणे, फिरणे, उत्सव, महोत्सव, चालीरीती, परंपरा इत्यादी गोष्टी आज आम्हाला तिरस्करणीय आणि हीन वाटू लागल्या आहेत. आमचे शासन, नेते, समाजकल्याणकर्ते, मानवहिताकरता झटणारे सुधारक, अशा यच्चयावत् उद्धारकर्त्यांना (?) जे जे आमचे सनातन आहे, ते ते नष्ट-भ्रष्ट करण्याची एकच एक घोर चिंता लागली आहे. या एकाच ध्येयाकरता ते सत्ता, संपत्ती, बुद्धी, सूक्त-असूक्त (चांगले-वाईट) यांची बाजी लावत आहेत. हिंदु समाजातील प्रत्येक गट आणि व्यक्ती यांच्यात स्वाभिमानाचा रतिमात्र अंश, अगदी केसाएवढासुद्धा शेष राहू नये, याकरता एक प्रचंड षड्यंत्र उभे ठाकले आहे. 

अस्पृश्यांना दलित, पिळले गेलेले (oppressed), असे म्हणून त्यांचे स्वत्व, स्वाभिमान आणि आत्मविश्वास यांचा विनाश करायचा का ? 

श्रेष्ठ वर्ग जो सवर्ण आहे, त्याला सांगायचे, 'तुम्ही गुन्हेगार आहात. तुमच्या बापजाद्यांनी, पूर्वजांनी घोर पातके केलेली आहेत, त्याची फळे आता भोगा'. अशाप्रकारे सवर्णांचे (श्रेष्ठवर्गाचे) स्वत्व, स्वाभिमान नष्ट करायचा का ? त्यांच्यात अपराधभाव (guilty conscious) निर्माण करायचा का ? हीनगंड पोसायचा का ? 
आज आमच्या संवेदनाही पश्चिमी बनल्या आहेत. केवढा दुर्विलास ! 

अशा स्वाभिमानशून्य, स्वत्वशून्य भ्याडांच्या सहकार्याने राष्ट्ररक्षण कसे होईल ?

- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन)