आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.
Showing posts with label स्त्री-धर्म. Show all posts
Showing posts with label स्त्री-धर्म. Show all posts

Sunday, November 18, 2012

अमेरिकेतील स्त्रिया पुनश्च स्त्रीत्वाकडे !


स्त्री आणि पुरुष यांचे धर्म वेगळे असले, तरी या दोहोंत परस्परांचे विलक्षण आकर्षण असते. समाधीतील ब्रह्मदेवाचे शरीर दुभंगून त्याचा डावा भाग पुरुष, तर उजवा भाग स्त्री झाल्यामुळे दोघांना एकमेकांचे आकर्षण असते. त्यालाच `प्रेम’ म्हणतात; म्हणूनच ते एकत्र येण्यासाठी धडपडतात. त्यामुळे मनूने विवाहसंस्था निर्माण केली. विवाहसंस्था हीच समाजाची आधारशिला आहे. कुटुंब नसेल, तर समाज उरणार नाही. तो जमाव किंवा समुदाय असेल. या विवाहालाच अत्यंत उदात्त, अती पवित्र आणि मंगल रूप देण्याकरिता विवाहसंस्कार आहेत. आमच्या वैदिक परंपरेप्रमाणे विवाह झाला, तर आमरण विवाह रहातोच. ते कुटुंब, तो वंश टिकतोच. ‘जोपर्यंत या पृथ्वीवर पर्वत, अरण्ये आहेत, तोवर तो वंश राहील’, अशी मनूची प्रतिज्ञा आहे.’

‘माता-भगिनींना आमची हात जोडून सर्व विनंती आहे की, त्यांनी स्त्रियांना ‘पुरुष’ बनविणार्‍यांच्या नादी लागू नये. स्त्रीमुक्ती आदी थोतांडे उभी करून आमचा समस्त समाज उद्ध्वस्त करू नये !’
‘अमेरिकेत स्त्रीत्व परत मिळवण्यासाठी ‘पुनश्च स्त्रीत्वाकडे’(Back to Womanhood)  ही स्त्रियांची चळवळ विलक्षण जोरात आहे. स्त्री मुक्तीच्या आत्यंतिक पुरस्कारामुळे अमेरिकेचे, एकूणच जगाचे आणि भारतातील आधुनिक स्त्रियांचे स्त्री-स्वातंत्र्याचे मृगजळ त्यांची तहान भागवू शकत नाही.
स्वातंत्र्याच्या नावाखाली तिथे स्वैराचार सुरू आहे. खरे स्त्री-स्वातंत्र्य तर दूरचे दिवे !’ आज आधुनिक स्त्रिया स्त्री-जीवनाच्या परिपूर्तीकरिता अपरिहार्य अशा प्रसन्न `स्त्री-पुरुष’ संयुक्त जीवनालाही मुकल्या आहेत. स्त्रीमुक्ती आंदोलनातील अग्रणी स्त्रियाच आता भयभीत झाल्या आहेत.  वेडेपणाचा अतिरेक झाल्यावरच शहाणपणा सुचतो, नरकात लोळल्यानंतरच स्वर्गाचे मूल्य कळते. अमेरिकेतील स्त्रिया स्त्रीत्व परत मिळवण्यासाठी करत असलेल्या ‘पुनश्च स्त्रीत्वाकडे’ (Back to Womanhood) चळवळीमुळे आमच्या स्त्रीमुक्तीवाल्या स्त्रियाही उलट दिशेने, म्हणजे परंपरागत स्त्रीधर्माकडे, गृहिणीधर्माकडे वळत आहेत, हा आमच्या मनु आदी शास्त्रकारांचा विजय आहे.
आमच्या विवाहादी परंपरा हा निसर्ग आहे. निसर्ग मोडला, तर तो सूड उगवेलच. अनैर्सिगकता किती काळ टिकेल ? आज अमेरिकेत ‘पुन्हा स्त्रीत्वाकडे’ (Back to Womanhood) ही चळवळ सुरू आहे. उद्या त्या स्त्रिया कुंकू लावतील. मग आमच्याही स्त्रिया कुंकू लावायला लागतील. यालाच स्त्रीदास्य-विमोचन म्हणायचे का ?’ - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (नारायणानंदनाथ)
अमेरिकी स्त्रियांना ‘आपण स्त्रीत्वाला मुकत आहोत’, हे लक्षात आल्याने 
त्यांची पुनश्च स्त्रीत्वाकडे वाटचाल
अमेरिकन स्त्रियांचे पुरुषीकरण झालेले आहे. सत्ताकरण, अर्थकारण अशा सगळ्या क्षेत्रांतून स्त्रिया पुरुषांच्या साहाय्याने काम करीत आहेत, बरोबरीने आहेत, कुठेही रतिमात्र मागे नाहीत. स्त्रीमुक्ती आंदोलन तर शिगेला पोहोचले आहेच आणि आता घड्याळाचा लोलक झुकला आहे. ‘पुनश्च स्त्रीत्वाकडे’ हे आंदोलन सामर्थ्यशाली आहे; कारण सगळे मिळूनही स्त्री अतृप्त, असंतुष्ट आहे. आता ती अंतर्मुख होत आहे.  ‘ती स्त्रीत्वाला मुकत आहे’, हे तिच्या ध्यानी येत आहे. तिनेच समान हक्क घटनेत सुधारणा करवून घेतली आहे.
पेनिलोप लोमोव्ह ही श्रेष्ठतम अमेरिकन संपादिका ‘स्त्रीत्व कसे मोहोरेल’, याकरता तळमळून कळवळून आक्रोश करते, ``हे पुरुषीकरण आता पुरे ! आता विराम हवा !’’ असे अमेरिकन स्त्रीहृदयाचे दुःख ती मांडते. समान हक्क मागायचे, स्त्रियांचे पुरुषीकरण अन् लिंगभेदाचे निर्मूलन करायचे आणि स्त्रीत्व नष्ट करून टाकायचे कन्या, पत्नी आणि माता असे जे परंपरेने संरक्षण होते, ते सगळेच नष्ट करायचे ? स्त्रीस्वभावाला, गृहिणीला, मातृत्वाला, तिलांजली देऊनच अर्थार्जनाच्या बाजारात तिला उभे रहावे लागते. आता अमेरिकन स्त्रीला उच्च जागा नकोत. धंद्यातले मालमत्ता हक्काची तिला फारशी कदर नाही. मातृत्व आणि गृहिणी यांकरिता आवश्यक त्या परंपरागत तरतुदी तिला हव्या आहेत ! गृहिणी आणि माता! ‘मातृत्व आधी. मग जर वेळच उरला, तर इतर कामे’, अशी अमेरिकन स्त्रीची धारणा आहे. 
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

Monday, January 30, 2012

नीतीशास्त्राला धरून असणारा समाज अभेद्य राहतो.


‘हिंदूंसाठी असलेले सर्वसाधारण नियम आध्यात्मिक स्वरुपाचे आहेत, भौतिक नाहीत; म्हणूनच हिंदू जातींचे परंपरागत आचार वेगवेगळे आहेत. त्यामुळे पाश्चात्त्यांना सर्व आचारांवर काही आक्रमण करता येईना; म्हणून हिंदूंनी जेवढे म्हणून श्रेष्ठ आणि अभिजात आचार मानले, त्यावर आक्रमण होऊ लागले. ‘हिंदूंनी आपली समाजरचना जाती, म्हणजे गटाच्या स्वरूपाची केलेली आहे. त्याप्रमाणे जगात अन्य कोणत्याही समाजात नाही; म्हणून जातीभेदाने हिंदू समाजाचा नाश झाला’, अशी हाकाटी चालू झाली. १. श्रेष्ठ आचारांत विधवा विवाहाचा निषेध आहे; म्हणून विधवा पुर्निववाहाचा दंडक (कायदा) संमत (पास) करून घेतला. हिंदूंच्या काही जातींतही (कनिष्ठ आचारात) विधवा पुर्निववाह होत नव्हते.
२. ‘प्रदानं प्रागृतोः ।’ (गौतमधर्मसूत्र, अध्याय १८, सूत्र २१) म्हणजे ‘कन्येचा विवाह ऋतुकाळ (मासिक पाळी) चालू होण्यापूर्वी करावा’ असे आपले धर्मशास्त्र सांगते. शारीरिक, मानसिक आणि समाजशास्त्रीयदृष्ट्या बाल वय हे अत्यंत हितकारक होय. साहेबांच्या समाजात अशी पद्धत नसल्याने त्यांना ही पद्धत रानटी दिसू लागली !
३. विवाहित स्त्री अगर कोणतीही श्रेष्ठ स्त्री हिने जेथे एकांती लोकांशी, परपुरुषांशी संबंध येईल, असे काम करायला घराबाहेर जाऊ नये, असा हिंदूंचा दंडक दिसला, तर स्त्रियांच्या आभासिक हक्काचा आश्रय करून त्याच्यावर आक्रमण केले गेले. अशा प्रकारे ब्राह्मणांची नैतिक मूल्ये सर्व ठिकाणी त्याज्य ठरवून शूद्रांची नैतिक मूल्ये प्रधान मानली जाऊ लागली आणि त्याचा हळूहळू प्रसार झाला.
४. स्पर्शास्पर्श, भक्ष्याभक्ष्य, पेयापेय एकूण एक संदर्भात शूद्रांचे अनिर्बंध आचार समाजात प्रधान होऊ लागले आहेत. ‘त्यालाच समाज सुधारणा म्हणावे’, असे समाजसुधारक नावाचा प्राणीवर्ग आम्हाला सांगत आहे.

आडदांड मुसलमानांना जे शक्य झाले नाही, ते इंग्रजांनी मायेने हात फिरवून करण्याला प्रारंभ केला. इंग्रज धूर्त आहेत. त्यांना ही गोष्ट ठाऊक आहे की, जोवर एखादा समाज आपल्या नीतीशास्त्राला धरून आहे, तोपर्यंत तो अभेद्य रहातो; म्हणून त्याने हिंदु धर्माच्या नैतिक मूल्याविषयीच शंका निर्माण केल्या. अंतःकरण शंकाकुशंकानी व्याकुळले की, मग कोणताही आचार धड राहू शकत नाही. मग विघात आपोआप होईल. तलवारीने शरिरे जिंकता येतील; पण मने जिंकता येत नाहीत. इंग्रज झाला तरी काय ? त्याच्याकडे नीतीच्या ज्या कल्पना प्रचलित असतील, त्याच तो घेऊन येणार ! त्याच प्रगतीच्या कल्पना इकडे आणल्या आणि आमच्या अहंगंड असणार्‍याने, म्हणजे सर्वाधिक आरडाओरडा करणार्‍यांनी त्या मान्य केल्या आणि अजूनही करत आहेत.’

भारतीय नारींनो, गुंड प्रवृत्तीच्या अमेरिकन पतीला सहचर बनवायचा कि नाही, याचा विचार करा !

‘अमेरिकेतील भारतीय नारींचा, ज्यांनी अमेरिकनांशी विवाह केलेला आहे, गोर्‍यांशी लग्न केले आहे, अशा भारतीय अमेरिकन स्त्रियांसंबंधीचा (इंडिअन American Women) सविस्तर अहवाल डॉ. शमिता दासगुप्ता, अध्यक्षा, इंडियन वुमेन्स ऑर्गनायझेशन, न्यू जर्सी ((Indian women'sorganization. New Jersey) यांनी प्रसिद्ध केलेला आहे. काही घटनांचा उल्लेख करतो.
१. इंदिरा २२ वर्षांची मद्रासची भारतीय नारी. तिच्या विवाहाला दोन महिने झाले. तोच तिचा अमेरिकन नवरा तिला घर सोडून जायला खडसावतो; कारण काहीही सांगत नाही. प्रचंड डॉलर्स हुंडा खिशात टाकतो आणि आता म्हणतो, ``तुला अमेरिकेच्या बाहेर घालवून देईन. तुझे इथले वास्तव्य नष्ट करून टाकीन.’’
२. अमेरिकन नवरा असलेल्या शोभा या भारतीय नारीला लग्नानंतर तिचा नवरा विलक्षण मारहाण करतो. ती बेशुद्ध आणि घायाळ होते. वाशिग्टन डी.सी.च्या रुग्णालयात भरती होते. त्या नवर्‍याविरुद्ध पोलीस तक्रार नोंदणी होते. पोलीस केस जर पुढे तशीच चालू ठेवली तर.....? थरथरणार्‍या शोभाला भय वाटते की, तिची हत्या होईल !
३. जया एक डॉक्टर, भारतीय नारी ! अमेरिकन पतीची भार्या होते. शिकागोला ती डॉक्टर असते. तिचा शारीरिक आणि मानसिक विलक्षण छळ होतो. ती हताश होण्याच्या मार्गावर होती. (She is on the verge of nervous breakdown.) घटस्फोटाकरता न्यायालयात जायला ती भिते; कारण तिला तिची मुले गमवावी लागतील !
अशा असंख्य घटना आहेत.’ ((Times of India sunday Review ३०.७.१९८९ च्या अंकात प्रिया कुरायन यांचा विस्ताराने लेख आलेला आहे.) - प.पू. डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक ‘सनातन चिंतन’, १०.११.२०११)
‘एक बिशप म्हणतो, `जनावरांना देवाची कल्पना करायला सांगितली, तर कदाचित करता येणार नाही; पण ‘सैतान कसा असतो ?’ असे विचारले, तर ते गोर्‍यांचा निर्देश करतील.’ - प.पू. डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक ‘सनातन चिंतन’, १०.११.२०११)