आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Saturday, August 28, 2010

देव आहे का?


कितीही मोठे विशाल आणि नियमबद्ध विश्व असू देत, ते 'कार्य' आहे. ही सृष्टी कधी ना कधी झाली आहे. सृष्टी निर्माण कार्य झाले आहे. या (विश्व) कार्याचे मूळ (कारण) असलेच पाहिजे. जसे एका मडक्याचे उपादान कारण 'माती' आहे आणि निमित्त कारण 'कुंभार' आहे. (देश, काल, वगैरे साधारण कारण आहेत). एक मडके करायचे म्हणजे किती अगणित क्रिया कराव्या लागतात. मडकं पाहिलं की त्याच्या निर्मात्याची आठवण होते. तो निर्माता 'मानव' कुंभार असलाच पाहिजे, असं आम्ही अनुमान करतो. कारण मडकं बनविणारा कुंभार आम्ही पाहिलेला असतो. याप्रकारे कोणतेही 'कार्य' पाहून त्याच्या कर्त्याचे अनुमान होणे स्वाभाविक आहे. अशी अगणित कार्ये आहेत, ज्यांची निर्मिती मानवाकडून होणे असंभव आहे.

जसे बीज उगवते, वृक्ष होतो, सूर्य उगवतो, मावळतो. भूकंप होतात, सागर मर्यादा धरतो, वायू वाहतो, मृत्यू धावाधाव करतो, या सर्व कार्यांचा कोणी 'कर्ता' असलाच पाहिजे. नास्तिक हा टेबल-खूर्ची बनवणारा सुतार अवश्य आहे, असे सांगतो. पण, वृक्ष पहाड, महासागर बनविणारा कुणी कर्ता मानलाच पाहिजे असे नाही, असे म्हणतो. त्याची आवश्यकता अपरिहार्य आहे, असे मानत नाही.

विश्वाचे सगळे कार्य दोन प्रकारचे आहे. एक 'मानव कृत' व दुसरे 'अमानवी' दोन्ही प्रकारच्या कार्याचे 'कारण' (Cause) आहेच. अनुमान प्रमाण स्वीकारल्याविना आस्तिक नास्तिकच काय पण पशूंची देखील प्रवृत्ती व्हायची नाही. अनुमान न मानले तर प्रत्यक्षही निरर्थक होते. या अनुमानाच्या आधारावरच मानव करू शकणार नाही, असे अद्भुत विश्व, त्या विश्वातील अनंत चेतन अचेतानांची कर्मे, आदींचा कर्ता असलाच पाहिजे, हे सिद्ध होते. सुताराविना टेबल खुर्च्या होऊ शकत नाहीत, कुंभाराविना मडके होत नाही, तर मग त्या परमात्मशक्तीविना, त्या अनंत चेतन शक्तीविना चंद्र, सूर्य, पर्वत, नद्या आदी काहीही होऊ शकत नाही. ज्ञान, इच्छा, आणि क्रियाशक्ती असल्याविना 'कार्य' घडत नाही. ज्ञानाविना इच्छा नाही. इच्छेविना कार्य नाही. जिथे ज्ञान आहे, इच्छा आहे आणि क्रिया आहे, तेथे कर्ता असतोच. प्रत्येक कार्याला कर्त्याची अपेक्षा असतेच. प्रत्यक्ष ज्ञान आणि इच्छा दिसत नाही आणि 'कार्य' दिसते. कमळ पहिले की, विचार येतोच की, हे सुंदर कमळ कुणाच्या तरी ज्ञान व इच्छाक्रियेने निर्माण झाले असले पाहिजे, तसेच या विश्वाचे कारण आहे.

-.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी समस्त वाङमय प्रकाशन संवाद पत्रिका क्र. १५ (देव आहे का?)

Saturday, August 21, 2010

सनातन हिंदुधर्म !

आधुनिक हिंदुत्ववाद्यांचा जो हिंदु राष्ट्रवाद आहे , ज्याचा मोठ्या प्रमाणावर हिरिरीने प्रसार करतात त्याचा संबंध सनातन हिंदु धर्म संस्कृतीशी आहे किंवा नाही ? आधुनिक हिंदुत्ववाद्यांच्या सनातन हिंदुधर्माशी सुतराम नाही . तो राष्ट्रवाद नाही . तो हिटलरी पद्धतीचा आहे . त्याला वेदाचे आणि ईश्वराचे अधिष्ठान नाही . आणि हेच या पुण्यभूमी भरतखंडाकरता फार फार खेदजनक आहे . महान दुर्भाग्य आहे .

सांख्य दर्शन सांगते , 'सत्व पुरूषान्यता ख्याति रूप ' विवेकाकरता सत्वगुणाचा उत्कर्ष अटळ आहे . त्या करता निष्काम स्वधर्मानुष्ठान अपरिहार्य आहे . धर्माचे ज्ञान वेदावरूनच होते , असेच 'सांख्य' देखिल सांगते . योगदर्शनानुसार चित्तवृत्ती निरोधरूप योग स्वधर्मानुष्ठानानेच होतो . स्वधर्माचे ज्ञान वेदावारूनच होते . कारण सांख्य योग दोन्ही वेदांचेच प्रामाण्य स्वीकारतात.

जैमिनिचे 'मीमांसा दर्शन ' तर 'धर्ममीमांसा' म्हणूनच प्रसिध्द आहे . भटट्पाद श्री कुमारिल जैमिनि दर्शनाचे सर्वश्रेष्ठ भाष्यकार आहेत . चोदनालक्षणोर्थो धर्म: / असे धर्माचे लक्षण ते करतात . याचा अर्थ प्रवर्तक ( विधी ) निवर्तक (निषेध ) वेदवचनावरूनच धर्म अधर्माचा बोध होतो .

नवनवोन्येष शालिनी प्रज्ञा म्हणजे 'प्रतिभा !' push button answer च्या प्रभावात असलेल्या Scientific-Temparament वाल्या आधुनिकांना प्राप्त होणे असंभव रामायण , महाभारताच्या तोडीचे ग्रंथ आज निर्माण होणे असंभव . ज्ञानदेव , तुकाराम , रामदासादि संत वा चाणक्यांच्या राजनीतिवरचा ग्रंथ निर्माण होणे असंभव ! ही प्रगती आहे का अधोगती .
- प. पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

Saturday, August 14, 2010

नागपंचमी!


विष्णूपासून निर्माण झालेला शेषनाग : शेषनाग आपल्या फण्यावर पृथ्वी धारण करतो, म्हणजे तिचा भार वहातो. तो पाताळात रहातो. तो ज्ञानी आहे. त्याची उत्पत्ती विष्णूच्या तमोगुणापासून झाली आहे. त्याला सहस्र फणे आहेत. त्याच्या प्रत्येक फण्यावर एक हिरा आहे. महासागरात या अशा शेषासनावर विष्णु प्रत्येक कल्पाच्या अंती शयन करतो.

भगवंताच्या अवतार कार्याशी संबंध : नाग भगवंताच्या अवतार कार्याशीही निगडित आहे. जेव्हा पृथ्वीवर अधर्म माजतो व त्यामुळे देवाच्या भक्‍तांना दुर्जनांकडून जाच होतो व त्यांच्या ईश्‍वरोपासनेत बाधा निर्माण होते, तेव्हा ईश्‍वर अवतार घेऊन दुर्जनांचा नाश करतो आणि धर्मसंस्थापनेचे कार्य करतो. धर्माची स्थापना करून तो हजारो वर्षांसाठी हा भूलोक साधनेसाठी अनुकूल बनवतो. निर्गुण परंतु सर्वशक्‍तीमान असा ईश्‍वर कोणत्या तरी रूपात प्रत्यक्ष प्रकट होऊन कार्य करतो, तेव्हा त्या कार्यासाठी `त्याचे सेवक' या नात्याने अन्य देवता वेगवेगळी रूपे धारण करतात व या धर्माच्या कार्यात भाग घेतात. शेषनागाचे स्थान या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्रेतायुग व द्वापारयुग यांच्या संधीकाळी श्रीविष्णूने रामाचा अवतार घेतला. तेव्हा शेषाने लक्ष्मणाचा अवतार घेतला. द्वापारयुग व कलीयुग यांच्या संधीकाळात श्रीकृष्णाचा अवतार झाला. त्या वेळी शेषनाग बलराम झाला. नागाचे देवत्व सांगतांना गीतेत श्रीकृष्णाने म्हटले आहे, ```नागांतील श्रेष्ठ जो `अनंत' तोच मी !'' `नागातील श्रेष्ठ जो `अनंत' तोच मी', अशी गीतेत श्रीकृष्ण आपली विभूती सांगतो. अनंत वासुकिं शेषं पद्मनाभंच कंबलं। शंखपालं धृतराष्ट्रे तक्षकं, कलियं तथा ।। अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपात्र, धृतराष्ट्र, तक्षक व कालिया अशा नऊ जातींच्या नागांची आराधना करतात, म्हणजे सर्पभय उरत नाही, विषबाधा होत नाही।'

(संदर्भ : .पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाङ्मय पत्रिका `घनगर्जित', वर्ष दुसरे, अंक ।)

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने...!

'वंदे मातरम' हे राष्ट्रगीत होईल, असा ठराव काँग्रेसने ठराव केला. १७ ऑक्टोबर १९३७ ला मुस्लीम लीगने मुस्लिमांच्या भावना दुखावल्या गेल्यात, असा कांगावा केला. 'वंदे मातरम' या राष्ट्रगीताचा निषेध केला.
पं. नेहरू हे काँग्रेसचे अध्यक्ष! काँग्रेसने वर्किंग कमिटीने 'वंदे मातरम' या गीताची पहिली दोन कडवीच गायली जातील असा ठराव केला.

संस्कृतीद्वेष्ट्या उलट्या खोपडीची कार्यशैली पहा कशी मूर्खपणाची आहे. काँग्रेसचे ८० टक्क्यांहून अधिक सदस्य 'वंदे मातरम' हेच राष्ट्रगीत झाले पाहिजे, या मताचे होते. परंतु नेहरूंनी त्या सर्वांना डावलून 'जन गण मन' हे राष्ट्रगीत २४ जानेवारी, १९५० ला जाहीर केले. म्हणजे २६ जानेवारी हा गणराज्य दिन. त्या आधी २ दिवस त्यांनी तसे घोषित केले. आमच्या राष्ट्रीय चवळीचा हा भयंकर अपमान होता. जगात असे कोणते स्वंतत्र राष्ट्र आहे की पार्लमेंटमध्ये त्या देशाचे राष्ट्रगीत गायला सभासदांना बंदी आहे?

काही मुस्लीम सभासदांनी निषेध केल्यामुळे पार्लमेंटमध्ये 'वंदे मातरम' हे राष्ट्रगीत गाण्याला बंदी होती.