आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Friday, December 31, 2010

पाश्चात्त्यांचे उपद्व्याप!

आपलीच संस्कृति श्रेष्ठ असा दुराग्रह असणार्या युरोपियनांना,
''संस्कृत भाषेतूनच अन्य सर्व भाषांचा उद्गम आहे' हे कसे मान्य होईल?
म्हणून या दुष्ट पाश्चात्यांनी कसे भयंकर उपद्व्याप केलेत, पहा !



  • अदमासे २५० वर्षा पूर्वी बंगालवर इंग्रजांचे अधिपत्य होते. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर विल्यम जोन्स यांनी प्राचीन ग्रीक, लॅटिन, फारशी संस्कृत या भाषांचा अभ्यास केला. या चारही भाषात त्यांना कमालीचे साम्य आढळले. त्यांनी तुलनात्मक भाषाशास्त्रांचा अभ्यास सुरु केला.
  • त्यांनी चारही भाषा एकाच पातळीवर ठेवून, या चारही भाषांच्या पूर्वी एक प्राचीनतम भाषा असली पाहिजे, त्या भाषेतून संस्कृत, लॅटिन, ग्रीक व फारशी जन्माला आल्यात' - असे ठोकून दिले. (वास्तविक संस्कृत भाषेतूनच या तिन्ही भाषांचा उद्गम व विकास आहे. संस्कृतानुगामी अशा त्या भाषा आहेत. संस्कृतमुळेच त्या समृद्ध झाल्या आहेत. संस्कृतेत्तर सर्व भाषा संस्कृताचीच विकृत रूपे आहेत.) अस्तित्वातच नसलेल्या या काल्पनिक प्राचीनतम भाषेला 'इंडो-युरोपियन' हे नाव दिले. ती भाषा बोलणार्‍या लोकांना 'आर्य' नाव दिले.
  • मग आर्य, 'मध्य आशियातून भारतात आल्याचे सिद्ध करण्याचा उपद्व्याप झाला. आर्य आक्रमणाचा कपोलकल्पित सिद्धांत पुष्ट करण्याकरता त्याचा वापर झाला.
  • संस्कृतभाषा केव्हा, कशी निर्माण झाली? म्हणजे उत्पत्तीचा काळ कोणता? हे आधुनिकाला ऐतिहासिक पद्धतिनुसार ठरविणे असंभव आहे. आधुनिक इतकेच सांगतात की जगातले सर्वाधिक प्राचीनतम ऋग्वेदादि वेद हे ग्रंथ संस्कृतात आहेत. यापेक्षा अधिक कुणी काही सांगत नाही. संस्कृत भाषेच्या चिंतनात एवढाच समारोप त्यांनी केला व ते निवृत्त झालेत. संस्कृतेतर सर्व भाषा संस्कृतच्या आश्रयाने वाढल्या, समृद्ध झाल्यात. संस्कृत मात्र इतर निरपेक्ष स्वतंत्र व स्वयंसिद्ध आहे.
  • आधुनिक इंजिनिअरिंग तंत्रज्ञान असे सगळे संस्कृतात कसे आणता येईल? ते मॉडेल तर अमेरिका, युरोपने पुरविले आहे.' हा बकवाज आहे.
  • इंजिनिअरिंगला 'शिल्प' म्हणतात. प्राचीन भारतातल्या भृगु, भारद्वाज, अत्रि, मय, भगीरथ अशा असंख्य इंजिनिअरिंगच्या संहिता आजही उपलब्ध आहेत.
  • संस्कृतचे जगातल्या अन्य भाषाहून वैशिष्ट्य आहे. ते असे...... संस्कृतात शब्दाची तीन लिंगे आहेत. तीन वचने आहेत. सात विभक्ती आहेत. समास आहेत. तद्विताचे अनेक भेद आहेत. कृतन्त आहे. नामधातु आहे, सन्नन्त यडन्त आहेत. अशा अगणित शब्द घटना आहेत. तसेच संधिस्वरूप भेद आहेत. दीर्घ भेद आहेत. अस जगातील अन्य कोणत्याही भाषेत नाहीत.
  • जगात जितक्या संस्कृतेतर भाषा आहेत त्या सर्वच भाषा शे-दोनशे वर्षात रुपांतरीत होतात. त्या भाषा इतक्या बदलतात की त्यांच्यातील जुने लेखन दुर्बोध होते. संस्कृतात असे कधीच होत नाही. कारण संस्कृत ही देव व वेद यांच्याशी निगडीत आहे. म्हणून कोणीही मानव तिचे स्वरूप बदलू शकत नाही. अशी ही संस्कृत भाषेच्या वर्ण-पद-वाक्य या त्रिविध स्वरुपाची विशेषता आहे.
  • आज भारतीयांसह जगातले अन्य सर्व आंग्लछायेच्या बुद्धिवादी (वा बुद्धिखोर) लोक इंग्रजी भाषेला विविध प्रकारचे लेखन, प्रकाशन, अनुवाद अशा असंख्य साधनांनी समृद्ध करण्याकरता अविश्रांत धडपडत आहेत. प्राचीन व अर्वाचीन सर्व ज्ञान इंग्रजीत आणण्याकरता त्यांचे अविरत प्रयत्न सुरु आहे. तथापि एवढे करूनही या म्लेंच्छ (इंग्रजी) भाषेचे जे भयावह अधःपतन होते आहे, ते थांबतच नाही. हे अधःपतन कसे थांबवावे हे युरोप, अमेरिकतील आधुनिक महापंडित, भाषाशास्त्रज्ञांना कळेनासे झाले आहे. त्यांनी हात टेकले आहेत.
  • इंग्रजी म्लेंच्छ भाषा आहे. उच्चारण शक्ती रहित अविकसित वन्य मानवांची भाषा आहे. वन्य मानव 'अ' पासून 'ह' पर्यंतची वर्णामाला शुद्ध स्थितीत कधी तरी उच्चारू शकतो का ?
- प. पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाङमय पत्रिका (घनगर्जित)

Friday, December 24, 2010

॥ प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी महासमाधी ॥

मार्गशीर्ष शुद्ध ९, बुधवार, अर्थात दि. १५.१२.२०१० रोजी,
दुपारी ०१:५० मि.

  • दहावे: शुक्रवार दि. २४.१२.२०१०
  • अकरावे: शनिवार दि. २५.१२.२०१०
  • बारावे: रविवार दि. २६.१२.२०१०
  • तेरावे: सोमवार दि। २७.१२.२०१०
महाराजांची प्राणज्योत अनंतात विलीन झाली
चिन्मय ब्रह्ममय झाले. अद्वैती मुरले. कणाकणांत भरून उरले.
घंटा आक्रंदली.... महाराज गेले...
आश्रमातील गाय व्याकुळतेने हंबरली.... महाराज गेले...
आश्रमासमोरील अश्वत्थ थरथरला ... महाराज गेले...
वृक्षावरचे पक्षी निश्चल झाले, वार्‍याची लाट लहरली... महाराज गेले...
कणाकणाने, क्षणाक्षणाने टाहो फोडला... महाराज गेले....
महाराज गेले?...
गेले कसले?
शरीर असून अशरीरी असलेले, शरीर असतांना कणाकणांत असलेले
अशरीरी महाराज जातील कसे?
भरलं आहे त्यांनी चराचर!...
आहेत ते कणाकणांत!...
आहेत ते क्षणाक्षणांत!...

शान्ति: शान्ति:



हे मूत्यू, हे नश्वर शरीर हवे तर खुशाल घेऊन जा!
मला त्याची खंत नाही
मी कुठल्याही मूर्त - अमूर्त शरीराने कार्यरत राहू शकतो.
ह्या शीतल चंद्र किरणांना धारण करून मी पृथ्वीवर संचार करेन...
पर्वतावरून खळखळणारा झरा, ओढा, नाल्याचे वस्त्र पांघरून दिव्य संचार करेन...
समुद्राच्या लाटांच्या रूपाने मी नृत्य करेन...
मंद वार्‍याची झुळूक हीच माझी प्रसन्न धुंद पावले असतील...
... अशी ही माझी नित्य नूतन असंख्य रूपे जरा पहा तर.
त्या क्षितीजा पलीकडच्या शिखरावरून मी उतरलो,
आणि मृतांना संजीवन दिले. झोपी गेलेल्यांना जागे केले.
अनेकांचे निराशेचे मुखवटे दूर सारले. अगणित दु:खितांचे अश्रू पुसलेत.
सुंदर फुलांना, मधुर गायन करणार्‍या पक्ष्यांना मी न्याहाळले आणि त्यांचे सांत्वन केले
माझ्या स्पर्शाने सर्व विश्वाला पावन केले.
मूत्यू, तू देखील मला शोधू शकणार नाहीस.
करण मी इतस्त: सर्वत्र, दिशादिशांतून संचार करतो.
आणि तरी देखील मी कुठेच नाही
- गुरुदेव

Wednesday, December 15, 2010

कलियुगातील महायोगी गुरुदेव प.पू. डॉ. काटेस्वामीजी यांचा देहत्याग

कलियुगातील महायोगी गुरुदेव .पू. डॉ. काटेस्वामीजी यांनी आज (१५ डिसेंबर ) दुपारी वाजून ५५ मिनिटांनी त्यांच्या वडाळा महादेव (तालुका श्रीरामपूर, जिल्हा नगर) येथीलश्री गुरुदेव आश्रमा देहत्याग केला. देहत्यागाच्या क्षणी गुरुदेवांच्या समवेत त्यांचे उत्तराधिकारी .पू. भास्करकाका उपस्थित होते. गुरुदेवांच्या पार्थिवावर पू. भास्करकाका यांनी सायंकाळी वाजता आश्रमातच अग्नीसंस्कार केले. या प्रसंगी गुरुदेवांचे शेकडो भक्त आणि शिष्य उपस्थित होते.

यापुढेही आश्रमातील सर्व कार्यक्रम अव्याहतपणे चालू रहातील’, अशी माहिती गुरुदेवांचे शिष्य पू. स्वामी रामानंदनाथ यांनी या वेळी उपस्थितांना दिली.

Saturday, December 11, 2010


स्वातंत्र्याला साठ वर्षे उलटून गेलेल्या या भारत भूमीच्या जनतेकडे आंम्ही पाहातो तेव्हा आंम्हाला आश्चर्याचा धक्काच बसतो. शेकडो आधुनिक कत्तलखान्यातून भारतात सर्रास गोहत्या होते आहे. गाय ही केवळ अर्थव्यवस्थेचा घटक म्हणून कोश वाड्मय व अन्यत्र लिहिल्या जाते. शिकविल्या जाते आहे. मनुस्मृति महामूर्ख म्हणून संबोधणाऱ्या विद्वानांची इथे चलती आहे. श्रीराम, श्रीकृष्णाची निंदा-नालस्ती करणार्‍या विद्वानांची इथे चलती आहे. शाळा कॉलेजातून संस्कृति विद्वेष पोसला जातो आहे. कुणाला कशाचेच काही वाटेनासे झाले आहे. ही शॉकप्रुफ अवस्था जगातले कोणतही संवेदनाक्षम मन ढवळून काढणारी आहे. अवदसा आहे.

अरे! या देशात शेंडीकरता हजारोंनी प्राणांचा होम केला आहे! गोरक्षणाकरता लक्षावधी माणसांनी आपल्या छातीचे कोट उभे केले आहेत. सोमनाथ मंदिर रक्षणाकरता ऐंशी सहस्त्र हिंदूनी आपल्या रक्ताचे सडे शिंपलेले आहे. जंगलातल्या वाघाला ताज्या रक्ताची चटक असते. त्यामुळे हवे ते करून तो मिळवू, अशी गुर्मी त्यांच्यात असते. प्राणिसंग्रहातल्या पिंजर्‍यात बंदीवान झालेल्या वाघाला मात्र बाहेर पडलो, तर जनावर मिळेल असे वाटतच नाही. त्यामुळे पुढ्यात येईल ते निमुटपणे खाण्याविना त्याला अन्य पर्याय उरत नाही. त्यांची मने मेलेली आणि मांसही मेलेले. मुदीड मनाचे आम्ही, आमची मने मेलेली आणि मांसही मेलेले. म्हणून तर गोमांस चवीने खाऊन, आमचे पाश्चात्याळलेले हिंदु गोहत्या बंदीची आंदोलने चालवतात. वाघासारखे आंम्ही आज त्यांचे शेळपट लाचार भेकड, झालो आहोत. आमची मने मेलेली आणि मांसही मेलेले. इंग्रजी छायेच्या पिंजर्‍यात आम्ही बंदीवान झालेले आहोत. पाश्चात्य छापाच्या हिंदु सुधारकाग्रणीनी स्वतः बरोबर आम्हालाही त्या पिंजर्‍यात कोंडले आहे.

विज्ञान व अधिभौतिक शास्त्रे कितीही वाढली तरी मानवाची अमृत तत्वाच्या, ज्ञानाकडील ही स्वाभाविक प्रवृत्ती कधीही कमी होणार नाही. आधिभौतिक शास्त्रे कितीही वृद्धींगत होवोत, सर्व आधिभौतिक सृष्टी विज्ञान, बगलेत मारून तत्वज्ञान नेहमीच त्यांच्या पुढे धाव घेत राहाणार.

***********************************

'वंदे मातरम' हे राष्ट्रगीत होईल, असा कॉंग्रेसने ठराव केला. १७ आक्टोंबर १९३७ ला मुस्लीम लीगने मुस्लीमांच्या भावना दुखवल्या गेल्यात, असा कांगावा केला. 'वंदे मातरम' या राष्ट्रगीताचा निषेध केला. पं. नेहरू हे काँग्रेसचे अध्यक्ष! काँग्रेस वर्किंग कमिटीने वंदे मातरम या गीताची पहिली दोन कडवीच गायली जातील असा ठराव केला. संस्कृतिद्वेष्ट्या उलट्या खोपडीची कार्यशैली पहा कशी मूर्खपणाची आहे. काँग्रेसचे ८० टक्के पेक्षा अधिक सदस्य वंदेमातरम हे राष्ट्रगीत झाले पाहिजे, या मताचे होते. परंतु नेहरूंनी त्या सर्वांना डावलून जन गण मन हे राष्ट्रगीत २४ जानेवारी १९५० ला जाहीर केले. म्हणजे २६ जानेवारी हा गणराज्य दिन ! त्या आधी दोन दिवस त्यांनी तसे घोषित केले आमच्या राष्ट्रीय चळवळीचा हा भयंकर अपमान होता. जगात असे कोणते स्वतंत्र राष्ट्र आहे की पार्लमेंट मध्ये त्या देशाचे राष्ट्रगीत गायला सभासदांना बंदी आहे? काही मुस्लीम सभासदांनी निषेध केल्यामुळे पार्लमेंटमध्ये वंदे मातरम हे राष्ट्रगीत गाण्याला बंदी होती.

- गुरुदेव डायरीतून

Sunday, December 5, 2010

अध्यास भाष्य!


ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिण्या आधी आचार्यांनी अध्यास भाष्य लिहिले. त्यात त्यांनी अध्यासाचे नेमके स्वरूप सांगितले. अध्यास म्हणजे काय? तो अध्यास कसा होतो. ते सांगितले. या अध्यासाचे परिणाम कसे भीषण आहेत, त्याचे विवरण केले. तो दूर का केला पाहिजे. याचे विवरण केले. तो कसा दूर करायचा ते दाखविले सांगितले.
अध्यास म्हणजे काय?
  • अध्यास म्हणजे अविद्या वा अज्ञान. असा अर्थ आहे. आचार्यांनी तोच अर्थ सांगितला आहे. शांकर भाष्यावर लिहिणाऱ्या थोर आचार्यांनी त्यात सूक्ष्म भेद केला आहे. सूक्ष्म छटा तिथे आहेत. शंकरांनी मात्र तसा काही फरक केला नाही. आमच्या बुद्धीचे समाधान होईल असे अध्यास भाष्य आहे.
अध्यासो नाम अनास्मिन तदबुद्धिः l
  • असे अध्यासभाष्यत विवरण आहे.
  • पूर्वी पाहिलेल्या एखाद्या गोष्टीची दुस-यावर भ्रांति होणे म्हणजे अध्यास ! असते शिंपी परंतु भ्रांति होते रजताची. असते दोरी परंतु भ्रांति होते सर्पाची (रज्जुसर्प). असते वाळू परंतु भ्रांति होते जलाची (मृगजळ).
  • शिंपी ही वास्तविक शिंपी असताना अज्ञानाने त्यावर चांदीची मिथ्या भ्रांति होते. या भ्रांति वा भ्रमालाच अविद्या म्हणतात.

अविद्या-अज्ञान-माया-अध्यास
  • ही अविद्या वा माया नकारात्मक नाही. अभावस्वरूप नाही. ती भावरूप आहे. तिला अस्तित्व आहे. ती प्रत्यक्ष जाणीव आहे.
  • शंकरांचा केवलाद्वैत सिद्धांत आहे. यात अविद्या अथवा अज्ञान वा अध्यास या संकल्पनेला फार महत्व आहे. शंकरांचा केवलाद्वैत विचार या अध्यासाभोवती फिरतो. अध्यास म्हणजे काय ज्याला नेमके कळते, त्यांना अद्वैत वेदांत कळू शकतो.
  • ही माया (वा अविद्या) परमेश्वराची एक महाशक्ती आहे. ही मायाशक्तीच परमेश्वराला नानाविध रुपात प्रकट करते. या मायेच्या आवरणामुळे जीवाला स्वतःचे आत्मस्वरूप जाणता येत नाही आणि तो जन्ममृत्यूच्या चक्रात अडकतो.
  • हा 'अध्यास' दूर करणे हेच मानवी जीवनाचे अंतिम आहे.
  • वास्तविक एकमेवाद्वितीय ब्रह्म असताना अध्यासाने वा मायेने भेद दिसतात, नानात्व दिसते. अनेकत्व दिसते.
  • ही जी अविद्या वा माया वा अध्यास आहे. ती अस्तित्व असलेली जाणीव असली तरी ती पूर्ण सत्य नाही इतकेच. तसेच ती पूर्ण असत्यही नाही. कारण अध्यास वा मायेचे परिणाम अनुभवाला येतात म्हणून अध्यास वा माया सत नाही. असत नाही. सद्सत नाही. तर ती अनिर्वचनीय आहे.
  • शंकर या मायेले 'सद्सद अनिर्वचनीया म्हणतात. तिच निरुपण अशक्य आहे.
अध्यास - मायेचे परिणाम काय होतात?
  • सृष्टीतील सर्व पदार्थाचे वर्गीकरण शंकर स्थूलमानाने दोन वर्गात करतात.
१) युष्यद प्रत्यय गोचर आणि २) अस्मद प्रत्यगोचर,
  • दोन्ही वर्गातील पदार्थ परस्पराहून अत्यंत भिन्न असताना अध्यासामुळे आपण त्यांचा एक दुसऱ्यावर आरोप करतो आणि त्यातूनच लोकव्यवहार सुरु होतो.
युम्यद - अस्मद - प्रत्यय - गोचरयोः l
तमः प्रकाशवत विरुद्ध स्वभावयोः l
सत्यानृते मिथुनीकृत्य अहमिदं ममेरम इति l

हा जो सत्यानृताचा लोकव्यवहार आहे, तो मिथ्याप्रत्यय रूप आहे. अध्यासामुळे जीव हा उपाधीशी एकरूप होऊन कर्ता, दुःखी व जन्ममृत्यूच्या फे-यात अडकणारा जीव होतो. द्वैतात अडकतो.
वास्तविक आत्मा निर्गुण निराकार, अकर्ता, अभोक्ता असताना अध्यासामुळे सगुण साकार कर्ता, भोक्ता होतो. तो कसा?
  • अध्यासामुळे ब्राह्मधर्म (पुत्र, पिता, बंधु) इंद्रियधर्म (अंध आणि पंगु) अंतःकरण धर्म (बुद्धि, इच्छा) यांचा निर्गुण निराकार। निष्काम आत्म्यावर अध्यारोप करतो. म्हणून तो जीवात्मा कर्ता, भोक्ता होतो.
- प. पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाङमय पत्रिका (घनगर्जित)