आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Saturday, August 14, 2010

नागपंचमी!


विष्णूपासून निर्माण झालेला शेषनाग : शेषनाग आपल्या फण्यावर पृथ्वी धारण करतो, म्हणजे तिचा भार वहातो. तो पाताळात रहातो. तो ज्ञानी आहे. त्याची उत्पत्ती विष्णूच्या तमोगुणापासून झाली आहे. त्याला सहस्र फणे आहेत. त्याच्या प्रत्येक फण्यावर एक हिरा आहे. महासागरात या अशा शेषासनावर विष्णु प्रत्येक कल्पाच्या अंती शयन करतो.

भगवंताच्या अवतार कार्याशी संबंध : नाग भगवंताच्या अवतार कार्याशीही निगडित आहे. जेव्हा पृथ्वीवर अधर्म माजतो व त्यामुळे देवाच्या भक्‍तांना दुर्जनांकडून जाच होतो व त्यांच्या ईश्‍वरोपासनेत बाधा निर्माण होते, तेव्हा ईश्‍वर अवतार घेऊन दुर्जनांचा नाश करतो आणि धर्मसंस्थापनेचे कार्य करतो. धर्माची स्थापना करून तो हजारो वर्षांसाठी हा भूलोक साधनेसाठी अनुकूल बनवतो. निर्गुण परंतु सर्वशक्‍तीमान असा ईश्‍वर कोणत्या तरी रूपात प्रत्यक्ष प्रकट होऊन कार्य करतो, तेव्हा त्या कार्यासाठी `त्याचे सेवक' या नात्याने अन्य देवता वेगवेगळी रूपे धारण करतात व या धर्माच्या कार्यात भाग घेतात. शेषनागाचे स्थान या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्रेतायुग व द्वापारयुग यांच्या संधीकाळी श्रीविष्णूने रामाचा अवतार घेतला. तेव्हा शेषाने लक्ष्मणाचा अवतार घेतला. द्वापारयुग व कलीयुग यांच्या संधीकाळात श्रीकृष्णाचा अवतार झाला. त्या वेळी शेषनाग बलराम झाला. नागाचे देवत्व सांगतांना गीतेत श्रीकृष्णाने म्हटले आहे, ```नागांतील श्रेष्ठ जो `अनंत' तोच मी !'' `नागातील श्रेष्ठ जो `अनंत' तोच मी', अशी गीतेत श्रीकृष्ण आपली विभूती सांगतो. अनंत वासुकिं शेषं पद्मनाभंच कंबलं। शंखपालं धृतराष्ट्रे तक्षकं, कलियं तथा ।। अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपात्र, धृतराष्ट्र, तक्षक व कालिया अशा नऊ जातींच्या नागांची आराधना करतात, म्हणजे सर्पभय उरत नाही, विषबाधा होत नाही।'

(संदर्भ : .पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाङ्मय पत्रिका `घनगर्जित', वर्ष दुसरे, अंक ।)

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने...!

'वंदे मातरम' हे राष्ट्रगीत होईल, असा ठराव काँग्रेसने ठराव केला. १७ ऑक्टोबर १९३७ ला मुस्लीम लीगने मुस्लिमांच्या भावना दुखावल्या गेल्यात, असा कांगावा केला. 'वंदे मातरम' या राष्ट्रगीताचा निषेध केला.
पं. नेहरू हे काँग्रेसचे अध्यक्ष! काँग्रेसने वर्किंग कमिटीने 'वंदे मातरम' या गीताची पहिली दोन कडवीच गायली जातील असा ठराव केला.

संस्कृतीद्वेष्ट्या उलट्या खोपडीची कार्यशैली पहा कशी मूर्खपणाची आहे. काँग्रेसचे ८० टक्क्यांहून अधिक सदस्य 'वंदे मातरम' हेच राष्ट्रगीत झाले पाहिजे, या मताचे होते. परंतु नेहरूंनी त्या सर्वांना डावलून 'जन गण मन' हे राष्ट्रगीत २४ जानेवारी, १९५० ला जाहीर केले. म्हणजे २६ जानेवारी हा गणराज्य दिन. त्या आधी २ दिवस त्यांनी तसे घोषित केले. आमच्या राष्ट्रीय चवळीचा हा भयंकर अपमान होता. जगात असे कोणते स्वंतत्र राष्ट्र आहे की पार्लमेंटमध्ये त्या देशाचे राष्ट्रगीत गायला सभासदांना बंदी आहे?

काही मुस्लीम सभासदांनी निषेध केल्यामुळे पार्लमेंटमध्ये 'वंदे मातरम' हे राष्ट्रगीत गाण्याला बंदी होती.

No comments:

Post a Comment