आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Saturday, July 31, 2010

सद्गुरुं तं नमामि!



  • ईश्वराची कृपा झाली की गुरुप्राप्ती होते
  • साक्षात शिव हे मानवी रुपात गुरुरुपणे प्रकटतात.
  • गुरुकृपेनेच अज्ञान मावळते आणि अद्वैतात प्रतिष्ठा होते .
  • ईश्वराचे सत्यस्वरूप अन्य कोणत्याही रूपाने कळू शकत नाही. केवळ गुरुकृपेनेच ते आकळू शकते.
मुमुक्षूला शास्त्रांचे संपूर्ण ज्ञान असून तो गुण संपन्न असला तरी गुरुविना तो ब्रह्मैत्म्यत प्रतिष्ठित होऊ शकत नाही. गुरूकडे जाऊन आणि त्यांच्या नियंत्रणात स्वत:चे व्यक्तिमत्त्व ठेऊनच मुक्ती सिद्ध होते. सद्गुरू ही शर्त अपरिहार्य आहे.

गुरुसेवा करायची?
तिचे चार प्रकार आहेत.

१. आप्त: - गुरूंना रुचतील तीच कर्मे करणे.
२. अंग: - गुरूंच्या सगुण देहाची शुश्रुषा, पाय दाबाने, डोके चोळणे, वगैरे.
३. स्थान: - गुरूंच्या मालकीच्या वस्तूंची काळजी घेणे.
४. सद्भाव: - साक्षात परब्रह्म मानून गुरूंचे ध्यान करणे.

गुरुदेव डायरी -

१. कर्मकांडाचा आनंद फळ, परमशांती, भगवत्प्राप्ती हेच आहे. "अर्थप्राप्तीकरता कर्मकांड आचरण ते गौण फळ आहे. धनाचा मुख्य हेतू धर्मानुष्ठान! धन मिळाले तर यज्ञ करा, दान करा, तप करा, परोपकार करा, इष्ट पुर्त कर्मे करा. राष्ट्रसेवा करा. दीनांना दान द्या.

२. काम हा पुरुषार्थ आहे, जीवनधारणेपुरता काम, म्हणजे खाणे-पिणे! शरीरस्वास्थ्याकरता ते अटळ आहे. शरीरस्वास्थ्य कशाता? भगवंताच्या भजनाकरता, अनुष्ठानादी कर्माता उद्दिष्ट, ध्येयाची पवित्रता अटळ आहे.

३.
गुरुजी: "बेटा, तू लोणी खातोस, बदाम पिस्ते घोटून घोटून पितोस?
पहिला शिष्य: "गुरुजी, आमच्या चाळीत पलीकडे एक गुंड राहतो. तो उन्मत्त झाला की मुलीबाळीची अब्रू देशोधडीला लावेल. तसे घडले तर आम्ही त्याचे मस्तक तोडू. म्हनुउन आम्ही बदाम, पिस्ते खातो."
गुरुजी: "शाब्बास पठ्ठे! खूप बदाम पिस्ते खा! मोठे पुण्य आहे. करण हेतू पवित्र आहे."
गुरुजी दुसर्‍या शिष्याला विचारतात, "तू बदाम पिस्ते का खातोस?"
दुसरा शिष्य: " शेजार्‍याचे मस्तक तोडण्याकरता."
गुरुजी: "दोन बदाम पिस्ते खाणे, हे तुझ्याकरता पापाचे आहे."

- प. पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाङमय पत्रिका घनगर्जित (वर्ष ९ अंक ०४ )

Wednesday, July 28, 2010

सहस्रावधी पाश्चात्त्यांना पुरून उरलेला सनातन धर्म !

. अमेरिका आणि युरोप यांची तर विलक्षण वैज्ञानिक प्रगति झाली आहे; परंतु अजूनही शुचितेच्या साध्या गोष्टीही त्यांना ठाऊक नाहीत. ‘सॅनिटेशनच्या बाबतीत ते अशुचि आहेत. त्यांच्या शौचाला पाणी नसते, तर ते कागदाचा वापर करतात आणि सांगतात की, `तो निर्जंतुकीकरण केलेला (sterilized) कागद आहे.'
या विसाव्या शतकात इंग्रजाळलेले पुष्कळसे हिंदू, मात्र आज कागदाने ढुंगण पुसतात. गोर्यांपासून त्यांनी हा रानटीपणा उचलला आणि अभिमानाने सांगतात, `हा कागद रोगजंतूपासून अलिप्त राखणारा आहे।'

. उद्दाम, राक्षसी आणि महामूढ तामसी पाश्चात्त्यांनी आणि त्यांचे बूट चाटणार्या पुरोगाम्यांनी गेली दोन शतके आमच्या सनातन सत्याचा विध्वंस केला, तरीही सहस्रावधी पाश्चात्त्य हिंदु धर्माच्या सनातन तत्त्वांनी आर्किषले गेले.

. ‘उच्च जातीबद्दल इतरांचा मत्सर वाढेल’, हे म्हणणे विचित्र आहे. मत्सर हा मानवी गुण असल्यामुळे जेथे म्हणून कोणत्याही कारणाकरिता कमी-अधिक भाव असेल, तेथे मत्सर उत्पन्न होणारच. आजच्या जातीहीन समाजात `मत्सरहा गुण नष्ट झाला आहे काय ? अन्य राष्ट्रांतून श्रीमंतांनी (भांडवलदारांनी) मिळवलेली संपत्ती आपल्या खिशात कशी जाईल, याची चिंता खालचा वर्ग करतो. त्यात मत्सर नसतो, असे म्हणायचे आहे का ? अंतर्गत भांडणे माजवण्याची भीती घालून राष्ट्राकडून वाटेल तशी खंडणी उकळण्याचे प्रयत्न कामगार संघटना करतात, ते कशाकरिता ?

. मनु धर्मनिष्ठ आचरणाचे नियमच देतो. नैसर्गिक प्रवृत्तींना दडपून टाकायला, दाबून टाकायला मनु िंकवा कोणतेच धर्मशास्त्रकार सांगत नाहीत. कामवासना जबर असेल, त्याने शास्त्राप्रमाणे ब्रह्मचर्यानंतर गृहस्थाश्रम स्वीकारायचा. वासना नसेल, तर मनु ब्रह्मचर्याश्रमापासून एकदम संन्यास घ्यायलाही संमती देतो.
आश्रमव्यवस्था अशी आहे की, मनुष्य आपल्या नैर्सिगक वृत्तींवर विचारपूर्वक विजय मिळवू शकतो. म्हणूनच मनु सांगतो, ``धर्म सर्वाधिक प्रमाण असावा. विचाराने वागावे आणि धर्ममर्यादांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी.’’ मनु सहज प्रवृत्तीचे उदात्तीकरण करायला सांगतो. ‘हळूहळू विचारपूर्वक त्याचे नियंत्रण कमी कमी होईल’, अशा आचरणाचे वळण देतो. मैथुन धर्मसंमत म्हणजे विवाह पद्धतीने स्वीकारायचे. तिथेही धर्मनियम म्हणजे ब्रह्मचर्य आहेच. वासनांतून मुक्ती व्हावी, यांकरिता विवाह आहे. मनु हिंदु समाजाचा नियंत्रक आहे. मनु अशी आचारपद्धती देतो की, गर्भादान संस्कारापासून ते अंत्येष्टीपर्यंतचे जे संस्कार आहेत, ते क्रमाक्रमाने वासनामुक्त करणारे आहेत.
धर्मसंमत मैथुन हे महाफळ देणारे आहे’, असे मनु सांगतोच. धर्माचे नियंत्रण नसेल, तर प्रसंगी मैथुनप्रवृत्ती बलात्कारही घडवील. काम ही तर ईश्वराची विभूती आहे; पण समाजावर धर्माचे नियंत्रण नसेल, तर समाज वासनांच्या आहारी जाईल. स्वैराचारी होईल.
- प.पू. गुरुदेव ( डॉ.) काटेस्वामीजी

Saturday, July 17, 2010

स्त्री धर्म - १


या आधुनिक आंग्लछायेच्या पुरोगामी स्त्री-पुरुषांना आमच्या पतिव्रतेचे हृदय कसे आकलन होऊ शकेल ? या बुद्धीखोर पुरोगामी साहित्यिकांनी पतिव्रतेचे, सतीचे जीवन-चरित्र भीषण रंगवले आहे। ज्वलज्जहाल पतिव्रतेचे अत्यंत ज्वलंत असे चरित्र, हे तर सतीत्वाच्या काही अंगांचा दिव्य प्रकाश आहे। त्या पतिव्रता, सतीसाध्वी स्त्रीला पेटत्या निखार्‍यांच्या पायघड्यांवरून चालायचे आहे। पाऊल तर वाकडे पडू द्यायचे नाही आणि आव तर असा आणायचा आहे की, जणू गुलाबाच्या कोमल पायघड्यांवरून चालते आहे. डोळ्यांत पेटती आग नव्हे, तर मृदू, मधु, सौम्य अमृताचा वर्षाव करणारी ती दृष्टी आहे.’
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, मे २००९)

नवरा हा प्रतिक असून पातिव्रत्याचा आचार स्वतःच्याच कायिक, वाचिक, मानसिक, आध्यात्मिक सामथ्र्याकरता आणि निःश्रेयसाकरता, म्हणजे मोक्षप्राप्तीकरता करायचा आहे। हे आम्ही ध्यानी घेतले, तर आधुनिक इंग्रजी शिक्षित विद्वान आणि विदुषी स्त्रियांच्या भ्रामक अवनतीच्या आणि शास्त्रकारांच्या खोट्या गोष्टी रंगविण्याचे टाळून कुटुंब संस्था आणि समाजाच्या विध्वंसाच्या पापापासून दूर रहातील।’
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, ४.१२.२००८)

‘मोडणारे कायदे तुम्ही केले। आता कितीही कायदे केले, तरी स्त्री अधिकाधिक असुरक्षित होईल. `स्त्रीच आपले रक्षण करू शकते. पुरुष तेथे हतबल आहे.’ (मनुस्मृती ९.१२) हिंदु कोडबिलाने स्त्री-जीवन उद्ध्वस्त केले, आमच्या गृहिणींचा, विवाह-संस्था आणि कुटुंब-संस्था यांचा घात करून स्त्रीला रस्त्यावर आणले. मनूवर सगळ्यांचा भयंकर रोष आहे. आधुनिक पुरोगामी या स्त्री-वैफल्याच्या संदर्भात सांगतात की, अजूनही मनूची सत्ता या भरतखंडावर अबाधित आहे.’
- गुरुदेव डॉ। काटेस्वामीजी (नारायणानंदनाथ) स्त्री धर्म - ४

*******************************************************************

मीना : आम्हाला प्रवासाचे स्वातंत्र्य हवे, साहस (Adventure) हवे. मी पहाड चढण्याचा सराव (mountaineering) करण्याकरता वेडी झाली आहे. मला मुक्त जीवन हवे.’
गुरुदेव : म्हणजे रानटी (wild) व्हायचे. रानटी जीवन (wild life) जगायचे, असेच ना ?
मीना : हं !
गुरुदेव : बंधनं नकोत, मर्यादा नकोत.
मीना : हं.
गुरुदेव : पृथ्वी, सूर्य, चंद्र, ग्रहमाला, सागर हे सगळेच जंगली (wild) झाले तर ? सागर उधळला, ग्रहमाला पृथ्वीवर सप्ताहशेषा (weekend) करता आली तर ? सागराने अवकाशयाना (Space Craft) सारखे आकाशात उड्डाण केले तर ?’’ (कुणीच बोलत नाही.)
गुरुदेव : जो मर्यादा सांभाळतो, तोच मुक्त जीवन जगू शकतो. मनमानी करणारा स्वैराचारी कधीच स्वतंत्रतेचे सुख भोगू शकत नाहीत. संयम पाळायचा आहे, मर्यादा राखायची आहे, वेशभूषा आणि केशभूषा यांतही मर्यादा राखली पाहिजे. पशूदेखील मर्यादा पाळतात आणि आम्ही.....’’
एक युवती : महाविद्यालयातील मुली आजकाल बांगड्या घालीत नाहीत.’’
गुरुदेव : का बरं ?
एक युवती : आम्ही घालणार नाही.
गुरुदेव : कारण ?
एक युवती : मुले कुठे घालतात बांगड्या ? आम्ही काही मुलांपेक्षा कमी नाही.
गुरुदेव : मुलांना मिशी फुटते. तुम्हालाही ती यावी, असे वाटते का ?
मुली किंचाळतात ``शी ! शी ! अय्या !’
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, जुलै २००७)

Saturday, July 10, 2010

प्रेम म्हणजे काय ?


प्रेम म्हणजे काय ? How will you define? व्याख्या कोणती?

नारद, भक्तिसूत्रांत व्याख्या करतात.


।। अनिवर्चनीयं प्रेमस्वरुपम् मूकास्वादनवत् ।।
  • प्रेमाची व्याख्या करता येत नाही. शब्दांनी प्रेम सांगताच येत नाही. मुक्याने गुळाचा स्वाद घेतला, अनुभवला, पण ती गोडी त्या मुक्याला काही सांगता येत नाही.
  • प्रेम ही अंत:करणाची वृत्ती आहे. भाव आहे. हृदयी जिव्हाळा आहे. प्रेम ओढून ताणून आणता येत नाही. भग्वत्प्रेम प्रत्येकात निर्माण होईल असेही नाही. ती संवेदना एखाद्याच भाग्यवंताला मिळते. नामस्मरण, जप तर सर्वांनाच करता येईल, पण प्रेम कसे आणायचे?
प्रेम नये सांगता, बोलता, दाविता । अनुभव चित्ता , चित्त जाणे।।
  • गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, धातुशिल्प अशा कलांचा अभ्यास करता येतो, पण प्रेमाचा अभ्यास होत नाही. प्रेमात अपेक्षा नसते. कामनेचा पुसटसा स्पर्शही नसतो. प्रेमाला सत्व, राज, तमाचा यत्किंचित गंधही नसतो. त्रिगुणांच्या पलीकडची ती चीज आहे. प्रेम ही पराभक्ती आहे. मीरेचं परमविशुद्ध प्रेम. ती परभक्ती, ते परमप्रेम. वृंदावनातल्या गोपींना भगवंताचं दर्शन घडविले. भग्वदर्शन घडले तोच गोपीच देहभान हरपून जायचे.
मुख डोळा पाहे, तशीच ती उभी राहे।
  • भग्वदकृपा ज्याच्यावर होते, त्यालाच भग्वदप्रेमाची प्राप्ती होते. प्रेम हे देवाचे देणे आहे. 'सा परानुरक्ती: ईश्वरे।' परमेश्वरावर परमप्रेम ती पराभक्ती, असे शांडिल्य सांगतात.
  • सा त्वस्मित् परम प्रेमस्वरूपा। परमात्म्यावरचं परमप्रेम तीच पराभक्ती, असे नारद सांगतात.
  • भगवंत प्रेमामुळे प्लावीत झालेल्या आर्द्र चित्ताचा भगवंताकडे अखंड वाहणारा वृत्तीप्रवाह ती पराभक्ती, असे मधुसूदन सरस्वती सांगतात.
हुतस्य भगवत् धर्मात धारवाहिकतान्गता । सर्वेश मनसौ वृत्ति: भक्तिरित्याभिधीयते ।।

- प.पू. गुरुदेव ( डॉ.) काटेस्वामीजी

Saturday, July 3, 2010

आम्ही केव्हा जागणार?




मेगास्थेनिस, स्ट्रॅनो, हुएनत्संग, अज्बेरूणी, मार्कोपोलो, अबुल फाजल, मॅक क्रिंडल, रोमोरोलो, आजचे बनार्ड शाॅ, नोबेल पारितोषक विजेता ऑक्सेस कॅरेल अशा तीन सहस्र वर्षापासून आजवरच्या साक्षी पाहूनही ज्यांच्या अंतरी वैदिकधर्म संस्कृती विद्वेषाची आग उफाळत राहील, तो केवळ दुरात्माच असू शकतो.
  • यवनांचा वकील मेगास्थेनिस लिहितो, 'भारतीयांत असलेल्या प्रामाणिकपणाचा, धर्माचरणाचा अल्पांश देखील अन्यत्र आढळायचा नाही.'
  • स्ट्रॅनो कौतुकाने, आदराने सांगतो, 'हिंदू दाराला कुलूपे लावत नाहीत आणि देण्या घेण्याचे करार देखील खत-पत्राविनाच करतात.'
  • चिनी प्रवासी हुएनत्संग म्हणतो, ' हिंदू अत्यंत कृतज्ञ आहेत. दु:ख दूर करण्याकरता तो स्वत:च्या प्राणांचा प्रसंगी होमही करतो. कुणी अपकार केला तर त्याला शासन देतो. परंतु शत्रूला सावध करून त्यांच्याशी टक्कर देतो. शरणागताला आसरा देतो.'
  • अज्बेरूणी असेच प्रशस्तीपत्रक देतो.
  • मार्कोपोलो तर चक्क लिहितो, ' इकडची पृथ्वी तिथे झाली तरी ब्राह्मण कधी खोटे बोलायचा नाही.'
  • अबुल फाजल लिहितो, ' हिंदु सज्जन आहे, मायाळू, करुणामय आहे. जगातल्या कोणत्याही माणसांशी भांडण करण्याची वृत्तीच त्यांच्यात नाही.'
  • खाफीखान हा कमालीचा हिंदुद्वेष्टा! शिव प्रभूंची प्रशंसा करतांना तो सांगतो, ' त्यांनी कधी मशिदीला उपसर्ग दिला नाही. कुराणाचा अवमान केला नाही. कोणत्याही धर्मातील स्त्रीला, वैर्‍याच्या स्त्रीला देखील सन्मानाने वागवले.'
  • मॅक क्रिंडल सांगतो, 'हिंदूंची न्यायबुद्धी, प्रामाणिकपणा आणि सरळपणा हे गुण विशेष आहेत.'
  • बनार्ड शाॅ नि:संदिग्ध सांगतो, 'भारतीय चेहरे, हे त्यांचे अंत:करण प्रगत करतात. ते सगळे जसे आहेत तसेच असतात. आमच्या चेहर्‍यावर मुखवटे आहेत.'
Hindu Dharma is ever new and will never cease to exist। It is like a vast and deep ocean. Only one drop of it is sufficient for us !'

प.पू. गुरुदेव ( डॉ.) काटेस्वामीजी