आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Saturday, August 28, 2010

देव आहे का?


कितीही मोठे विशाल आणि नियमबद्ध विश्व असू देत, ते 'कार्य' आहे. ही सृष्टी कधी ना कधी झाली आहे. सृष्टी निर्माण कार्य झाले आहे. या (विश्व) कार्याचे मूळ (कारण) असलेच पाहिजे. जसे एका मडक्याचे उपादान कारण 'माती' आहे आणि निमित्त कारण 'कुंभार' आहे. (देश, काल, वगैरे साधारण कारण आहेत). एक मडके करायचे म्हणजे किती अगणित क्रिया कराव्या लागतात. मडकं पाहिलं की त्याच्या निर्मात्याची आठवण होते. तो निर्माता 'मानव' कुंभार असलाच पाहिजे, असं आम्ही अनुमान करतो. कारण मडकं बनविणारा कुंभार आम्ही पाहिलेला असतो. याप्रकारे कोणतेही 'कार्य' पाहून त्याच्या कर्त्याचे अनुमान होणे स्वाभाविक आहे. अशी अगणित कार्ये आहेत, ज्यांची निर्मिती मानवाकडून होणे असंभव आहे.

जसे बीज उगवते, वृक्ष होतो, सूर्य उगवतो, मावळतो. भूकंप होतात, सागर मर्यादा धरतो, वायू वाहतो, मृत्यू धावाधाव करतो, या सर्व कार्यांचा कोणी 'कर्ता' असलाच पाहिजे. नास्तिक हा टेबल-खूर्ची बनवणारा सुतार अवश्य आहे, असे सांगतो. पण, वृक्ष पहाड, महासागर बनविणारा कुणी कर्ता मानलाच पाहिजे असे नाही, असे म्हणतो. त्याची आवश्यकता अपरिहार्य आहे, असे मानत नाही.

विश्वाचे सगळे कार्य दोन प्रकारचे आहे. एक 'मानव कृत' व दुसरे 'अमानवी' दोन्ही प्रकारच्या कार्याचे 'कारण' (Cause) आहेच. अनुमान प्रमाण स्वीकारल्याविना आस्तिक नास्तिकच काय पण पशूंची देखील प्रवृत्ती व्हायची नाही. अनुमान न मानले तर प्रत्यक्षही निरर्थक होते. या अनुमानाच्या आधारावरच मानव करू शकणार नाही, असे अद्भुत विश्व, त्या विश्वातील अनंत चेतन अचेतानांची कर्मे, आदींचा कर्ता असलाच पाहिजे, हे सिद्ध होते. सुताराविना टेबल खुर्च्या होऊ शकत नाहीत, कुंभाराविना मडके होत नाही, तर मग त्या परमात्मशक्तीविना, त्या अनंत चेतन शक्तीविना चंद्र, सूर्य, पर्वत, नद्या आदी काहीही होऊ शकत नाही. ज्ञान, इच्छा, आणि क्रियाशक्ती असल्याविना 'कार्य' घडत नाही. ज्ञानाविना इच्छा नाही. इच्छेविना कार्य नाही. जिथे ज्ञान आहे, इच्छा आहे आणि क्रिया आहे, तेथे कर्ता असतोच. प्रत्येक कार्याला कर्त्याची अपेक्षा असतेच. प्रत्यक्ष ज्ञान आणि इच्छा दिसत नाही आणि 'कार्य' दिसते. कमळ पहिले की, विचार येतोच की, हे सुंदर कमळ कुणाच्या तरी ज्ञान व इच्छाक्रियेने निर्माण झाले असले पाहिजे, तसेच या विश्वाचे कारण आहे.

-.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी समस्त वाङमय प्रकाशन संवाद पत्रिका क्र. १५ (देव आहे का?)

No comments:

Post a Comment