आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Tuesday, August 6, 2013

कोटी कोटी प्रणाम !
गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांची आज जयंती
हिंदूंचे भीषण अधःपतन होण्यामागचे कारण
     यामागे सनातन धर्माचा काहीच दोष नाही; किंबहुना सनातन धर्माचे अनुसरण करत नसल्यामुळे हिंदूंचे भीषण अधःपतन झाले आहे.
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १०.३.२०११)

हिंदु संस्कृतीची अद्वितीयता

एतद्देशप्रसूतस्य सकाशात् अग्रजन्मनः ।
स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् पृथिव्यां सर्वमानवाः ॥ - मनुस्मृति २.२०
 अर्थ : या ब्रह्मवर्तादी देशात जन्माला येणारे जे चारित्र्यसंपन्न आणि विद्वान लोक असतील त्यांच्यापासून पृथ्वीवरील सर्व मानवांनी सदाचाराचे, सद्वर्तनाचे धडे घ्यावेत. आमच्या चरणाशी बसून विश्‍वातील यच्चयावत मानवांनी आचरणाचे वळण गिरवावे. 
आक्रमणाच्या उद्देशाने हिंदुस्थानात आलेल्यांनी हिंदु धर्म स्वीकारून हिंदु संस्कृतीशी एकरूप होणे 
१. तक्षशिलेच्या यवनराजाचा दूत हेलिओडरस याने तिथे गरुडध्वज उभारला आहे. त्यावरील लेखात तो भगवान विष्णूचा उपासक ‘भागवत असा स्वतःचा निर्देश करतो.
२. कांबोज, यवन, पल्हव, दरर, खश इत्यादी लोक पूर्वी क्षत्रिय होते; पण संस्कार न झाल्याने त्यांना वृषलत्व (शूद्रत्व) प्राप्त झाले. धार्मिक संस्कार न झाल्यामुळे मूळचे क्षत्रिय असूनही त्यांना शूद्रत्व प्राप्त झाले; म्हणूनच ते क्षत्रियत्वाचे संस्कार त्यांच्याकडून करवून घेऊन त्यांना क्षत्रियत्वाचा अधिकार दिला गेला.

३. परकीय आक्रमणात हूण हे प्रसिद्ध आहेत. हिंदुस्थानात आल्यावर त्यांनी हिंदु धर्म स्वीकारला. हूण राजा मिहिरकुल हा शिवोपासक होता. हुणांनी भारतात राज्य स्थापिले. हळूहळू ते हिंदु संस्कृतीशी एक होऊन गेले. फुढे त्यांची गणना राजपुतांच्या श्रेष्ठ कुळात होऊ लागली. इथे जात्युत्कर्ष आहे.
४. कुलचुरी हे स्वतःला चंद्रवंशी म्हणवतात. त्या कुलातील महाप्रतापी कर्णनृपतीचा विवाह हूण राजकन्या आवल्लदेवीशी झाला होता. त्यांचा पुत्र यशःकर्ण हा पित्यानंतर गादीवर आला. राजपूत राजे कडवे हिंदु धर्माभिमानी होते. त्यांनी हिंदु धर्म व संस्कृती यांच्या रक्षणाकरता वेळप्रसंगी प्राणार्पण करायलाही मागे पुढे पाहिलेले नाही.
कर्मफल आणि पुनर्जन्म यांवरील श्रद्धेमुळेच हिंदु समाज भ्रष्टाचार अन् गुन्हेगारी यांपासून सहस्रशः वर्षे दूर असणे 
    प्रत्येक हिंदूच्या अंतर्यामी आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला सुख-दुःख प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. आफल्याला आपल्या कर्माची फळे या जन्मात किंवा पुढच्या जन्मात भोगावी लागतात. कर्मफलाच्या धारणेमुळेच हिंदु समाज भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी यांपासून सहस्रशः वर्षे दूर राहू शकला. स्वातंत्र्याच्या काळापर्यत कर्मफल आणि पुनर्जन्म यांविषयीची श्रद्धा कायम होती. स्वातंत्र्यानंतर ती क्षीण होत गेली आणि आता जवळजवळ नष्ट झाली आहे.
भारतभूमीची सहस्रो वर्षांची तेजःपुंज परंपरा तरुण पिढीत अपूर्व प्रज्ञा, प्रतिभा, बल आणि सत्त्व विकसित करील 
    स्वामी विवेकानंद अमेरिकेला खडसावतात, तुमचे ज्ञान, तुमची संस्कृती आणि तुमची जीवनशैली ही केवळ वरवरची आहे. थोडेसे घासले की, त्या कातडीखालचा हिंस्त्र पशू उसळून वर येतो. आपल्या थोर व पावन भारतभूमीची सहस्रो वर्षांची परंपरा आपल्या पाठीशी उभी आहे. त्याची लाज कशाकरिता ? ही तर आमची तेजःपुंज ज्वलंत अस्मिता आहे. जगाला ही वैशिष्ट्येच शिकवायची आहेत. भारताने नेतृत्व करायचे आहे. ही जी ज्वलज्जहाल अस्मिता आहे, तीच आमच्या तरुण पिढीत अपूर्व प्रज्ञा, प्रतिभा, बल आणि सत्त्व विकसित करील. 
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी