आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Monday, December 23, 2013

धर्मनिरपेक्षता म्हणजे हिंदु विरोध !



 
भारतातल्या हिंदूंची सर्वाधिक मोठी शोकांतिका ही आहे की, त्यांना या आधुनिक भ्रष्ट, दुष्ट धर्मनिरपेक्षतेचा जबरीने साक्षी व्हावे लागत आहे. निधर्मीपणाचा इतका नीच, इतका निकृष्ट, इतका भ्रष्ट अवतार त्याला पहावा लागत आहे. नेहरूंनी आणि त्यांच्या अनुयायांनी या निधर्मीपणाचा उदो उदो केला. त्यांनीच त्या निधर्मीपणाला अत्यंत अधम, अती भ्रष्ट रूप दिले. या निधर्मी राष्ट्राच्या नावाखालीच हिंदूंचा सनातन धर्म, ती सनातन संस्कृती, तो हिंदूंचा राष्ट्रीय वारसा, ती संस्कृत भाषा, या सर्वांचे नरडे आवळून त्यांना हद्दपार करणे, हे सगळे या निधर्मीपणाच्या बुरख्याखाली घडत आहे. कनिष्काला त्याच्या गोधडीखाली दाबून गुदमवरून त्याचे प्राण घेतले, तसे निधर्मीपणाच्या गोधडीखाली हिंदूंचा तो राष्ट्रीय सनातन वारसा, तो सनातन धर्म, संस्कृती, यांचे प्राण घेतले जात आहेत. धर्मनिरपेक्षता म्हणजे ‘हिंदु विरोध !
    भारतातले हिंदुद्वेष्टे निधर्मी शासन संस्कृतला मृतवत (Dead) ठरवण्याकरता सर्व सत्ता-संपत्ती पणाला लावत आहे. भारताचा निधर्मीवाद सिद्ध करण्याकरता संस्कृत शिकवायचे नसेल, तर काय
शिकवायचे ? अरबी, चायनी, जपानी ? हिंदूंचे ग्रंथ, रामायण, महाभारत, पुराणे शिक्षण संस्थातून शिकवायला बंदी का ? संस्कृतवर बंदी का ? हिंदूंनी जीवनाशी किती द्रोही आणि विसंगत व्हावे ? ही का बुद्धीमानी आहे ? निधर्मीवाद्यांनाच या देशाचा कायदा घडवता यावा ? केवढा हा जुलूम ! हिंदुस्थानात जर आम्हाला आमच्या श्रुति-स्मृति, पुराणे अभ्यासता येत नसतील, तर आमचा स्वतःचा वारसा कुठे अभ्यासावा ? हॉवर्ड ? शिकागो, ऑक्सफर्ड, केंब्रिज येथे
   आज इंग्रजी शिकलेल्या (आंग्लाळलेल्या) भारतियांची शरिरे भारतीय आणि मन मात्र पाश्‍चिमात्य (पाश्‍चात्त्य विचारसरणीचा पगडा असलेले) होणे, हे भारताच्या वाढत्या लोकसंख्येपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. याला भारतियांच्या मनाची मृदूता आणि इतरांना सहज स्वीकारणारी वृत्ती कारणीभूत आहे. या तुलनेत जपान आणि चीन या देशांतील नागरिकांची मने अधिक सावध अन् कणखर आहेत. त्यांनी इंग्रजी बोलणार्‍या विज्ञाननिष्ठ विचारसरणी असणार्‍या जगताला त्यांची हुकूमत त्यांच्या खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक रचनेवर अद्याप चालवू दिलेली नाही, हे सत्य लक्षात घेणे महत्त्वाचे आहे

गुरुदेव डॉकाटेस्वामीजी (घनगर्जितएप्रिल २०१०)

Sunday, December 1, 2013

तुम्ही गुन्हेगार आहात !

सर्व धर्म समान आहे का ? सर्वधर्मसमभाव हिंदु समाजावर का लादता ? सर्व धर्म समान आहेत, असे सांगता ? या विश्वात कोणत्याही दोन गोष्टी पूर्णपणे समान नाहीत. दोन वस्तू वा माणसांत भेद असायलाच हवा. त्याविना त्यांचे वेगळे अस्तित्व कसे असू शकेल ? कोणतीही दोन माणसे पूर्णतः एक असूच शकत नाहीत. मग सर्व धर्म समान कसे असू शकतील ? हा प्रश्नच मस्तकात मेंदू नसल्याचे लक्षण आहे'.

मॅट्रिकच्या (पूर्वीच्या दहावीच्या) मराठीच्या पाठ्यपुस्तकात ‘दोन शब्दांत दोन संस्कृती', असा एक पाठ आम्ही पाहिला. श्रुति-स्मृति-पुराणोक्त ही एक संस्कृती आणि विज्ञाननिष्ठ प्रणाली (up-to-date) ही दुसरी संस्कृती. बुद्धीवादी आणि विज्ञाननिष्ठ प्रणालीचे अनुसरण केले पाहिजे. श्रुति-स्मृति पुराणोक्त धर्माचे आता दफन झाले पाहिजे, असा त्या विधानाचा आशय या पाठातून व्यक्त होतो. श्रुति-स्मृति पुराणोक्त ही संस्कृती अबुद्धीवादी आहे का ? विज्ञानविरोधी आहे का ? 

आमचे राष्ट्र आणि समाज यांचे लक्षावधी वर्षांपासून मंतरलेल्या अभेद्य कवचासारखे संरक्षण करणार्या भारतीय वेशभूषा, केशभूषा, खाणे, पिणे, चालणे, फिरणे, उत्सव, महोत्सव, चालीरीती, परंपरा इत्यादी गोष्टी आज आम्हाला तिरस्करणीय आणि हीन वाटू लागल्या आहेत. आमचे शासन, नेते, समाजकल्याणकर्ते, मानवहिताकरता झटणारे सुधारक, अशा यच्चयावत् उद्धारकर्त्यांना (?) जे जे आमचे सनातन आहे, ते ते नष्ट-भ्रष्ट करण्याची एकच एक घोर चिंता लागली आहे. या एकाच ध्येयाकरता ते सत्ता, संपत्ती, बुद्धी, सूक्त-असूक्त (चांगले-वाईट) यांची बाजी लावत आहेत. हिंदु समाजातील प्रत्येक गट आणि व्यक्ती यांच्यात स्वाभिमानाचा रतिमात्र अंश, अगदी केसाएवढासुद्धा शेष राहू नये, याकरता एक प्रचंड षड्यंत्र उभे ठाकले आहे. 

अस्पृश्यांना दलित, पिळले गेलेले (oppressed), असे म्हणून त्यांचे स्वत्व, स्वाभिमान आणि आत्मविश्वास यांचा विनाश करायचा का ? 

श्रेष्ठ वर्ग जो सवर्ण आहे, त्याला सांगायचे, 'तुम्ही गुन्हेगार आहात. तुमच्या बापजाद्यांनी, पूर्वजांनी घोर पातके केलेली आहेत, त्याची फळे आता भोगा'. अशाप्रकारे सवर्णांचे (श्रेष्ठवर्गाचे) स्वत्व, स्वाभिमान नष्ट करायचा का ? त्यांच्यात अपराधभाव (guilty conscious) निर्माण करायचा का ? हीनगंड पोसायचा का ? 
आज आमच्या संवेदनाही पश्चिमी बनल्या आहेत. केवढा दुर्विलास ! 

अशा स्वाभिमानशून्य, स्वत्वशून्य भ्याडांच्या सहकार्याने राष्ट्ररक्षण कसे होईल ?

- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन)