आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Sunday, September 26, 2010

जो हिंदुहितपर हात उठायेगा...!


आजची पश्चिमी जीवन धरणी आणि विज्ञानवाद, आजची औद्योगिक संस्कृती आत्मघातकी आहेत. ही जीवन प्रणाली पूर्णपणे अभारतीय आहे. भारताची, भारतीयांची अस्मिता पायदळी तुडवणारी आहे. भारतीय जीवनमूल्ये चिरडून टाकणारी आहे. भारताच्या समाजशास्त्रीयतेच्या ठिक-या उडवणारी आहे. आमच्यात धुरीणींनी, शासनाने त्यांचा अंगीकार करून आमच्या सत्वाचे, अस्मितेचे नरडेच आवळले आहे.

ही आत्मघातकी धारणा, ही अमानुषता अमानवीयतेला परतवून लावण्याची क्षमता केवळ रामायणाच्या चिंतन धारेत आहे. राष्ट्रीय एकात्मता, भावनात्मक ऐक्य, Emotional Integrity, अखंड, अविच्छिन्न, असाध्य राखण्याची, सुस्थिर ठेवण्याची शक्ती केवळ रामायणाचीच आहे. पश्चिमी प्रणालीने मानवाला आत्मवंचित केले आहे. आजचा तरुण उल्लू, थिल्लर, भोंगळपट बनविला आहे. पैसा हाच परमात्मा झाला आहे. Standard of Living, समाजवाद, Economic Development , कल्याणकारी शासन हे सगळे बिनबुडाचे Superficial अर्थशून्य, मूल्यहीन, फसव्या 'कल्पना' जगभर आणि भारतातही तरंगत्या फुग्यासारख्या सोडल्या आहेत. रशियन, अमेरिकन आणि पश्चिमी सडक्या प्रणालींना मूठमाती देणे ही आजच्या काळाची सर्वाधिक महत्त्वाची निकड आहे. आमच्या तरुणांत, तो तिरस्कार, ती गर्हणीयता उफाळून यायला हवी. हे घडले की शील, त्याग, तेजस्विता, आत्मनिर्भरता उफाळून येईल.

रामायणाची ही ताकद आहे. 'हा भारत माझा देश आहे, हे राष्ट्र माझे स्वतःचे आहे, याचा तिरस्कार तो माझा तिरस्कार, याच्या उणीवा तो माझा दोष, या राष्ट्राची थोरवी ते माझे मोठेपण, ही अतूट श्रद्धा, ही भावना रामायणाने सहस्रश: वर्षांपासून जोपासली आहे आणि पुढेही तशीच अखंड जोपासत राहील.

रामायण चिंतनाने हीच धारणा, हे श्रद्धा, व्यक्तीत, जाती - जमातीत, समाजात एकत्र विनासायास फोफावते. रामायण असे राष्ट्र ममत्व निर्माण करते, जोपासते, संबधित करते. त्यातच अनुशीलन, अनुमाप होणे, आजच्या काळाची प्राथमिक गरज आहे.

भारत अखंड, एकात्म राखणारी सहस्रश: वर्षांपासून गंगा ब्रह्मपुत्रेसारखी अखंड वाहणारी ही रामकथा आमच्या पाठीशी खडी आहे. ही भावना, ही श्रद्धा आमच्या युवकांच्या मानसांत दृढमूल झाली की आपला तरुण शीलवान संयमी, मर्यादा सांभाळणारा आणि कर्तव्यकठोर, प्रज्ञावान, तेज:पूंज, होईल. हां हां म्हणता भारताची अखंडता, तेजस्वीता, गुणवत्ता, प्रज्ञा जगासमोर सूर्यासारखी तळपेल. विश्वाचे गुरुत्व भारताकडे विनासायास येईल.

- .पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाङ्मय पत्रिका (साप्ताहिक सनातन चिंतन वर्ष ५ अंक ३२)

Friday, September 3, 2010

भगवत प्रेम कसे असते!


जयति जयति कृष्ण देवकिनन्दनो य:।
वसति वसति चित्ते मोहनिर्नाशकोऽसौ॥

अवति अवति धर्मं सत्यरूपं परात्मा।

चरणशरण मास्तां वासुदेवं नमामि॥

श्रीकृष्ण एकेकी मृत्यूची घरघर सुरू व्हावी अशा विलक्षण आजाराने ग्रासला. तो बराच वेळ बेशुद्ध होता. भानावर आल्यानंतर अंथरुणावर सारख्या करवटी बदलत मोठ्याने कण्हत होता. त्याचे सर्वांना जीवन व प्रकाश देणारे कांतिमान कमलमुख कोमेजले होते. त्याचे गोपाल सखे, गोपी, नंद, यशोदा, सगळेच दु:खातिशायाने सुस्कारे सोडत होते. वृंदावनातील प्रत्येक जण भीतीने थरथरत होता. त्यांचे सर्वस्व असा श्रीकृष्ण! त्यांच्या अस्तित्वाचा अंत तर होणार नव्हता? सर्वस्व असणा-या श्रीकृष्णाने सत्याच्या समक्ष अशा भयानक यातना सहन कराव्यात? चिकित्सक आलेत आणि गेलेत. हतबुद्ध चित्ताने त्यांनी माना हलवल्या, त्यांना त्या विलक्षण रोगाचे निदान काही होईना.

नंद व यशोदा हतबुद्ध झालेत. अखेरीस त्यांने श्रीकृष्णाला विचारले, "आता तूच तुझ्या आजाराचा उपाय सांग!" दु:खाने कण्हत कण्हत श्रीकृष्ण उद्गारला, "या पवित्र वृंदावनातील माझा एखादा भक्त माझ्या डोक्यावर त्याच्या पायाची धूळ झाडेल, तर तत्क्षणी माझा आजार दूर होईल!" यशोदा नंद तयार झालेत.

श्रीकृष्ण म्हणाला, "तुम्ही माझे माता पिता आहात, बलराम थोरला भाऊ! तिघे वर्ज्य करून वृंदावनातील कोणाही भक्ताची चरणधूळ..."

वार्ता वृंदावनात पसरली.

पुतना, अधासूर, धेतकासूर अशा राक्षसांचा वध करणारा, कालीयामर्दन करणारा, गोवर्धन उचलणारा, वणवा गिळून टाकणारा, श्रीकृष्ण हा साक्षात परमात्मा आहे, अशी वृंदावनवासियांची खात्री होती. आपल्या अपवित्र पायाची धूळ साक्षात परमात्म्याच्या माथ्यावर झाडायला कोण तयार होईल? त्यांचा उत्कट भक्तीभाव आड येत होता. वार्ता पसरता पसरता वृंदावनाजवळच्या गांवी असलेल्या राधेच्या कानी गेली. ती ओरडली, "काय? माझा कृष्ण आजारी आहे? त्याला भक्ताची चरणधूळ हवी आहे?"

ती धावत आली, सरळ नंदाच्या वाडयात आली. श्रीकृष्णाच्या अंथरुणाजवळ गेली आणि क्षणार्धात तिने आपला पाय श्रीकृष्णाच्या डोक्यावर ठेवला. श्रीकृष्णाविना मन, जीवन नसलेल्या अतुलनीय, परमोत्कट भक्त अशा राधेच्या चरणस्पर्शाने श्रीकृष्ण तात्काळ बारा झाला.
गुरुदेवांनी सांगितलेल्या कथा (घनगर्जित वर्ष ९, अंक ५)

******************************

गुरुदेव,

तर्केषु कर्कशधियो वयमेव नान्ये
काव्येषु कोमलधियो वयमेव नान्ये ॥
तन्त्रेषु यन्मितधियो वयमेव नान्ये
कृष्णेषु संयतधियो वयमेव नान्ये ॥

(तर्कशास्त्रात आपल्यासारखा कठोर आणि काटेकोर अन्य कोणी नाही। काव्यरचना आणि काव्याच्या आस्वादात आपल्यासारखा कोमलमनी अन्य नाही। तांत्रिक उपासनेत आपल्यासारखा सुनियंत्रित अन्य नाही। ... आणि 'कृष्णाच्या' आराधनेत आपल्यासारखा सयंतचित्त अन्य नाही.)