आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Saturday, June 26, 2010

वेदप्रकटदिनाच्या निमित्ताने!


१. ॐकार:
१. `श्रीमद्‌भागवत सांगते, ``समाहित ब्रह्माच्या हृदयकोशापासून नाद (अव्यक्‍त शब्द) प्रकटतो. दोन्ही कान बंद करून आत तो ध्वनी ऐकायला येतो. त्या अनाहत नादाची उपासना करून योगी मोक्षाचे अधिकारी होतात.
२. ॐकार त्याच परमात्म्याचा वाचक आहे.

३. त्या ॐ कारापासून सर्व वार्क्ैंापंच अविर्भूत झाला. तो ॐ कारच सर्व मंत्राचे तसेच सर्व वेदांचे बीज आहे. त्या ॐ काराच्या `अ, उ, म' वर्णापासून सत्त्व, रज, तम; ऋक्, यजु, साम; भू:, भूव:, स्वर्लोक; स्वप्न, जागृत आणि सुषुप्‍ती अशा अवस्था निर्माण होतात. ब्रह्मदेवाने या `ॐ' बिजापासून वर्णमाला उत्पन्न केली. त्याने या अक्षरापासूनच यज्ञाकरता भू:, भुव:, स्व:, महा:, जन, तप, सत्यम, अशा सात व्याह्रती आणि प्रणव यांसह वेद प्रकाशित केले.' - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्‍ताहिक सनातन चिंतन, १० मे २००७, अंक १५)

२. क्रियांना धर्म किंवा अधर्मत्व वेदाज्ञेने (वेदवचनाने) प्राप्‍त झाले !
क्रियांचे मूल्यमापन करण्याचा निकष धर्मवेदाज्ञेनुसार उत्पन्न झाला. क्रियांना धर्म किंवा अधर्मत्व वेदाज्ञेने (वेदवचनाने) प्राप्‍त झाले. तसे नसते, तर प्रत्येक क्रियेला केवळ अस्तित्वच असते. शुभ-अशुभत्व, सुष्टत्व-दुष्टत्व नसते. याचाच अर्थ धर्माकरिता मानव आहे. धर्म मानवाचा नियंता (म़्दहूीदत्ती) आहे. मानव धर्माचा नियंता नाही. तो धर्माचे सूत्र आहे. `धर्माच्याकरिता आम्हास जगति रामाने धाडियले ।' याचा तोच अर्थ.' - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, सप्टेंबर २००८)

३. हिंदु धर्माला तुच्छ लेखण्यासाठी वेदांतील शब्दांचा विकृत अर्थ करणारे ख्रिस्ती !
`वेदमहर्षी पंडीत सातवळेकरांनी अथर्ववेदाच्या प्रस्तावनेत विवाह सूक्‍तातील `देवकामा' या शब्दाचा थोडा इतिहास दिला आहे. `देवकामा' याचा अर्थ `देवांनी जिला वंदन करावे अशी पतिव्रता !' `देवृकामा' शब्दात व्यभिचार आहे. भारतीय परंपरेत देवृकामा असा पाठ कोठेही नाही. सेंट पिटर्सबर्ग या कॅथॉलिक प्रणालीच्या वैदिक शब्दकोशात जबरीने तसा पाठ दिला आहे आणि हिंदुस्थानात ज्यांनी ऋग्वेद प्रकाशित केला त्यांनी तो स्वीकारला आहे. हा कॅथॉलिक ख्रिस्ती परंपरेचा वैदिक शब्दकोश आमच्या सनातन हिंदूंच्या परंपरा तुच्छ करण्याची प्रतिज्ञा करूनच निर्माण झाला आहे. हे आमच्या ध्यानी येऊ नये, हे दुर्दैव !' - गुरुदेव डॉ. काटेस्वामी (साप्‍ताहिक सनातन चिंतन, १० मे २००७, अंक १५)

४. वेद, रामायण आणि महाभारत यांवर अत्यंत अश्लील लिहिणार्‍यांना मानसिक आणि बौद्धिक बल कोठून मिळते ?
`वेद, रामायण आणि महाभारत यांवर अत्यंत अश्लील लिहिणार्‍या या तामसी, हिंस्रक आणि निधर्मी संशोधकांना मानसिक आणि बौद्धिक बल कोठून मिळते, ते आम्ही विचारपूर्वक पाहिले पाहिजे. त्या पातळीवर या अतिरेक्यांची (होय ते अतिरेकीच आहेत.) गाठ घ्यावी लागेल.' - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्‍ताहिक सनातन चिंतन, २९.५.२००८)

५. वेदधर्माचे महत्त्व सर्वांना कळणे आवश्यक
`सनातन हिंदु धर्माचा मुख्य ग्रंथ वेद. अपौरुषेय, अनादी, अनंत वेदांतून हिंदु धर्म निर्माण झाला. हिंदु धर्माची पुन्हा सुव्यवस्थित, सुरक्षित घडी बसवायची असेल, तर हिंदु समाजाचे वेदांकडे लक्ष वेधून घ्यायला हवे. वेदरक्षणाकरताच भगवंताचे वराह, राम, कृष्णादी अवतार झाले. त्या वेदांचे रक्षण व्हायला हवे. वेदज्ञान, वेदांचे अध्ययन, वेदांची महती, वेदांची कीर्ती, वेदज्ञान काश्मीरपासून कोचीनपर्यंत आणि बाणकोटापासून जगन्नाथपुरीपर्यंत सर्व आबालवृद्धांना झाले पाहिजे. वेदमंदिरात प्रवेश करा. तुम्हाला सनातन धर्म मिळेल. त्यातील एकेक दालन, त्यातील एकेक चौक, त्यातील एकेक सभामंडप इतका विलोभनीय, इतका शृंगारलेला, इतका विशाल आहे की, आम्हा हिंदूंच्या शेकडो पिढ्या आनंदाने आयुष्य काढतील. या वेदप्रसादाने सृष्टीनिर्मितीपासून ते या एकविसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत आमचे संरक्षण केले आहे. वेदांच्या या दुर्भेद्य किल्ल्याला भगदाडे पाडण्याचा प्राचीन काळी काय थोडा प्रयत्‍न झाला ?

ग्रीस, रोम अशी राष्ट्रे आणि त्यांच्या संस्कृती जगातून केव्हाच नष्ट झाल्या. कालौघात सर्वच्या सर्व प्राचीन राष्ट्रे गुदमरून गतप्राण झाली आणि हिंदु राष्ट्र अजूनही सळसळते आहे. वेदांनी आमची संस्कृती घडविली, रक्षिली, चिरंतन केली. बौद्ध-जैनांचे हल्ले आम्ही निष्प्रभ केले.' (संवाद, गुरुदेव प्रकाशन, पृष्ठ २, ३ व ४)

Sunday, June 20, 2010

वेदोऽखिलं धर्म मूलम् | (भाग १)



सूर्यो यथा सर्वलोकस्य चक्षु: |

मानवाचे जे व्यवहार सुरु असतात, ते केवळ सूर्याच्याच प्रकाशाने चालतात. डोळे हे पाहण्याचे साधन आहे. परंतु सूर्य नसेल तर डोळे असूनही दिसणार नाही. पदार्थ प्रकाशित करायला जर डोळे समर्थ असते तर सूर्यप्रकाश जेथे मुळीच नाही, अशा अंधार व्याप्त प्रदेशातील वस्तू आपणांस का दिसत नाहीत? डोळे उत्तम असतानांही घनकीर्र अंधारात आपण सर्व आंधळेच असतो.

संपूर्ण वेद वाङमय धर्माचा मूलस्त्रोत आहे. वेदांचा प्रतिपाद्य विषय धर्म आहे. वेदविहित पवित्र कर्तव्य कर्म हे धर्माचे स्वरूप आहे, जे कालाधीन आहे. 'काल' सूर्याधीन आहे. सूर्यामुळे दिवस व रात्र हा कालविभाग होतो. सूर्यच सृष्टी, स्थिती, संहाराचे मूळ कारण आहे. सूर्यामुळेच सृष्टी, स्थिती व संहार होतात. म्हणून सूर्यदेव ब्रह्मा, विष्णू, महेश स्वरूप आहेत.

सर्व भुवनांत सूर्याचा प्रकाश जातो. सूर्यच समस्त ग्रहांचा सम्राट आहे. सूर्यदेव रात्री आपली शक्ती अग्नीत ठेवतात. निखील वेदांचे प्रतिपाद्य सूर्यदेव आहेत. सूर्यनारायण हे आकाशमंडलात प्रतिदिन नियमाने सत्यमार्गाने (क्रांतिवृत्त) जातात आणि संसाराचे संचलन करतात. आकाशात दिसणारे नक्षत्र, ग्रह आणि राशीमंडल सूर्यदेवाच्या आकर्षण, विकर्षण शक्तीमुळेच कायम आहेत. थकून गेलेले जीव रात्री गाढ निजतात व सूर्योदयाला उठतात.
  • ऋग्वेद सांगतो, "सूर्यदेव आपल्या तेजाने सर्वांना प्रकाशित करतात."
  • यजुर्वेद सांगतो, "सूर्य देव समस्त भुवनांना उज्जीवीत करतात."
  • अथर्ववेद सांगतो, " हृद्रोग व श्वास्रोग यांचा उपशमन करतात."
सूर्यकिरणे पृथ्वीवरचे ओले पदार्थ सुकवतात आणि समुद्र जल स्वयं पिऊन पिण्यायोग्य असे पाणी सृष्टीला पुरवतात. सूर्यकिरणांचे उपकार अनंत आहेत. महान आहेत. नैमिषारण्यात प्रदीर्घ यज्ञ प्रसंगी, सूतजींनी शौनकादि ऋषींना सूर्यदेवासंबधी विस्तृत विवरण केले. सूर्योपासनेची सर्व अंगे सांगितली. माहात्म्य सांगितले. सर्वच पुराणांतून ठिकठिकाणी सूर्यमहिमा आहेच. सूर्यपुराण हे सूर्योपासनेचे स्वतंत्र उपपुराण आहे. हे पुराण श्रेष्ठ मानले जाते. ब्रह्मर्षी वसिष्ठांनी बृहद्बल राजाला सूर्याचे ऐश्वर्य सांगितले.

चंद्रभागेच्या तीरावर वसलेल्या साम्ब्पूर नागरी अति प्राचीन काळापासून फार मोठे व सुंदर सूर्यमंदिर आहे. तिथे रथात आरूढ झालेली सूर्याची सर्वोत्कृष्ट अत्यंत मनोहर मूर्ती आहे. श्रीकृष्णपुत्र सांब याने हे सूर्यमंदिर बांधले. श्रीकृष्णाने शाप दिल्याने त्याला भयंकर कुष्ठरोग झाला होता. त्याने कडक सूर्योपासना केली आणि त्याचा रोग बरा झाला. तो शापमुक्त झाला. त्यानेच सूर्योपासनेकरता हे सूर्यमंदिर बांधले.

यज्ञाच्या अग्नीत दिलेली आहुती सूर्यापर्यंत पोहोचते आणि अन्न निर्माण करते. यज्ञाने पर्जन्य आणि पर्जन्याने अन्न होते. हे शास्त्रसिद्ध आहेच आणि लोकप्रसिद्धही! सूर्याचा वर्ण जपाकुसुमसमान लाल आहे. शास्त्रवेत्ते, जाणते लोक आदित्य मंडलातील हिरण्य पुरुषाची उपासना करतात. आदित्यमंडल हजार योजने विस्तारले आहे. सूर्यदेव पूर्वाभिमुख प्रादुर्भत झाले. सूर्यनारायण प्रतिदिन मेरूपर्वतासभोवती (मेरू पर्वताला उत्तर ध्रुव म्हणणे हा क्षुद्रपणा आहे) चोहो बाजूने फिरतात.

- प. पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाङमय पत्रिका घनगर्जित (वर्ष ८ अंक ११ )

Monday, June 14, 2010

संस्कृत मृत भाषा आहे का?


संस्कृतचे जे विरोधक आहेत, ते बहुतांशी इंग्रजीचे पुरस्कर्ते आहेत. ते इंग्रजीला 'वर्गीकृत भाषा' असे म्हणायला तयार नाहीत. इंग्रजांनी आमच्यात जातीभेद पोसला, जातीद्वेष वाढवला. इंग्रजी भाषा आणि संस्कृती विषयी भारतीयांत विलक्षण आत्मीयता निर्माण केली. संस्कृत भाषेविषयी अनादर निर्माण केला. परिणामत: युरोप अमेरिकेत उदयाला आलेल्या औद्योगिक संस्कृतीचा भारतात विलक्षण प्रसार व प्रभाव निर्माण झाला.

दुर्दैव असे की स्वार्थाकरता देवधर्म आणि संस्कृतीचेही उपकरण म्हणून वापर करणारे सैतान या आधुनिक औद्योगिक संस्कृतीने निर्माण केले आहेत. मानवतेची बात सर्वत्र हवेवर तरंगते आहे. पण माणसाला माणसाचा आधार, असा व्यवहारही आज केवळ नितीशास्त्रांच्या ग्रंथात उरला नाही. या सर्व वस्तुस्थितीचे सखोल चिंतन करून, अनाग्रही बुद्धीने, विवेक करून आजच्या संस्कृती विद्वेषाला व विस्मरणाला, या धर्मग्लानीला आळा घालण्याचे उपाय आम्ही शोधण्याचे शिकस्त करायला पाहिजे. संस्कृत कमिशन समोर साक्ष देतांना सी.व्ही. रमण या विश्वविख्यात वैज्ञानिकाने संस्कृतची तुफान प्रशंसा केली. त्यांनी नि:संदिग्ध सांगितले, "संस्कृत हीच भारताची राष्ट्रभाषा झाली पाहिजे."

शिक्षणक्षेत्र, शासन क्षेत्र व शास्त्रीय क्षेत्र यांचे ऐश्वर्य संस्कृत या राष्ट्रभाषेतून प्रत्ययाला येते. संस्कृत ही राष्ट्रभाषा अपरिहार्य आहे. तिला पर्याय नाही.
भारताची ज्वलंत अस्मिता, राष्ट्रीयत्व टिकवायचे असेल, विकसीत करायचे असेल, तर संस्कृतला शरण गेल्याविना गति नाही. संस्कृतविना आमचे राष्ट्र, आमचा इतिहास, आमच्या परंपरा जिवंत राहू शकणार नाहीत. संस्कृतमध्ये काही उणीवा असल्या तरी राष्ट्रभाषा म्हणून तिचा स्वीकार करावाच लागेल .

टीका: "संस्कृत ही मृतभाषा आहे. याचा अर्थ तिला आजचे वैज्ञानिक व औद्योगिक प्रगतीशी जुळवून घेता यायचे नाही. तितकी ती व्यापक व परिणत होऊ शकत नाही."
खंडन: "..... हा तुमचा दुराग्रह भारताच्या संस्कृतीचे तुम्हाला रतीमात्र ज्ञान नाही."

इ.स. १८३८ चा विल्यम अडम यांच्या चौकशी समितीचा अहवाल.

बंगालचा शिक्षण विषयक तिसरा अहवाल आहे तो. त्यात स्वच्छ निर्देश आहेत की कलकत्ता, मिथीला, दक्षिण बिहार येथील पंडितांनी गणित यंत्र विज्ञान, ज्योतिर्गणित, नव्यनीतिशास्त्र, शेतकी, वाणिज्य, वास्तुशिल्पे, धरणे, पाटबंधारे, या विषयावरचे काही ग्रंथ संस्कृतात लिहिले आहेत. काही लिहून देण्याचे आश्वासन कमिशनला दिलेले आहे. विज्ञान व Industries यांना धारक व पोषक असे शेकडो संस्कृत ग्रंथ आहेत. भृगुसंहीतेसारखे विज्ञान व Industries वरचे अगणित प्रकाशित व अप्रकाशित ग्रंथ आहेत. भारद्वाजांचा Aeronautics वरचा तुटका फुटका ग्रंथ आज उपलब्ध आहे. तो एकच एक ग्रंथ विज्ञान, वास्तुशिल्प, Industries वगैरे विषयावरचे शास्त्रग्रंथ निर्माण करण्याची संस्कृत भाषेची अनंत आकाशातील झेप दाखवून देईल.

Industry and Science यांच्या अभिव्यक्तीला संस्कृत मारक आहे असे म्हणण्याचे दु:साहस करू नका!

प. पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाङमय पत्रिकार्जित (वर्ष ९ अंक ३ )

Saturday, June 5, 2010

दुष्ट युरोपियानांची कारस्थाने!


आमचे विद्वान प्राचार्य आणि यच्चयावत आंग्ल छायेचे पंडित सांगतात, ' मॅक्स्मूलर आदी पाश्चात्यांची वेड वाङ्मयाचे किती चिकाटीने अथक परिश्रम करून संशोधन केले. आमचे प्राचीन वेदादी संस्कृत ग्रंथ अनुवादलेत. प्रस्तावना लिहिल्यात. केवढे उपकार आहेत आमच्यावर?

आर्य आक्रमणांचा कपोलकल्पित सिद्धांत प्रस्थापित करण्याकता या दुष्ट मॅक्स्मूलारादि पाश्चात्यांनी कसे भयंकर
उपद्व्याप केलेत. ठाऊक आहे?

अदमासे २५० वर्षांपूर्वी बंगालवर इंग्रजांचे आधिपत्य होते. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर विल्यम जोन्स यांनी प्राचीन ग्रीक, लॅटिन, फारशी संस्कृत या भाषांचा अभ्यास केला. या चारही भाषांत त्यांना कमालीचे साम्य आढळले.

मग तुलनात्मक भाषाशास्त्रांचा अभ्यास सुरु झाला. या ज्या चार प्राचीन भाषा आहेत, ( त्यात संस्कृत आलेच) त्यांना एकाच पातळीवर ठेवण्यात आले. (वास्तविक संस्कृत भाषेतून या तिन्ही भाषांचा उद्गम विकास आहे. संस्कृतानुगामी अशा त्या भाषा आहेत. संस्कृतमुळेच त्या समृद्ध झाल्या आहेत.

आपलीच संस्कृती श्रेष्ठ असा दुराग्रह असणार्या युरोपियनांना संस्कृतातून सर्व भाषांचा उद्गम आहे, हे कसे मान्य होईल? त्यांने चारही भाषा एकाच पातळीवर ठेऊन "या चारही भाषांच्या पूर्वी एक प्राचीनतम भाषा असली पाहिजे. त्या भाषेतून संस्कृत, लॅटिन, ग्रीक फारशी जन्माला आल्यात" असे ठोकून दिले.

अस्तित्वातच नसलेल्या या काल्पनिक प्राचीनतम भाषेला इंडो-युरोपिअन हे नाव दिले. ती भाषा बोलणार्या लोकांना 'आर्य' हे नाव दिले. आर्यांचे सर्वात प्राचीन साहित्य 'वेड' होय. हे मान्य केले. वेदांची निर्मिती करणारे आर्य मध्य आशियातून भारतात आल्याचे सिद्ध करण्याचा उपद्व्याप केला. आर्य आक्रमणाचा कपोलकल्पित सिद्धांत पुष्ट करण्यासाठी त्याचा वापर जगभर होऊ लागला.

(संदर्भ: गुरुदेव वाङमय पत्रक 'साप्ताहिक सनातन चिंतन' वर्ष ५ अंक २० )