आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Saturday, July 17, 2010

स्त्री धर्म - १


या आधुनिक आंग्लछायेच्या पुरोगामी स्त्री-पुरुषांना आमच्या पतिव्रतेचे हृदय कसे आकलन होऊ शकेल ? या बुद्धीखोर पुरोगामी साहित्यिकांनी पतिव्रतेचे, सतीचे जीवन-चरित्र भीषण रंगवले आहे। ज्वलज्जहाल पतिव्रतेचे अत्यंत ज्वलंत असे चरित्र, हे तर सतीत्वाच्या काही अंगांचा दिव्य प्रकाश आहे। त्या पतिव्रता, सतीसाध्वी स्त्रीला पेटत्या निखार्‍यांच्या पायघड्यांवरून चालायचे आहे। पाऊल तर वाकडे पडू द्यायचे नाही आणि आव तर असा आणायचा आहे की, जणू गुलाबाच्या कोमल पायघड्यांवरून चालते आहे. डोळ्यांत पेटती आग नव्हे, तर मृदू, मधु, सौम्य अमृताचा वर्षाव करणारी ती दृष्टी आहे.’
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, मे २००९)

नवरा हा प्रतिक असून पातिव्रत्याचा आचार स्वतःच्याच कायिक, वाचिक, मानसिक, आध्यात्मिक सामथ्र्याकरता आणि निःश्रेयसाकरता, म्हणजे मोक्षप्राप्तीकरता करायचा आहे। हे आम्ही ध्यानी घेतले, तर आधुनिक इंग्रजी शिक्षित विद्वान आणि विदुषी स्त्रियांच्या भ्रामक अवनतीच्या आणि शास्त्रकारांच्या खोट्या गोष्टी रंगविण्याचे टाळून कुटुंब संस्था आणि समाजाच्या विध्वंसाच्या पापापासून दूर रहातील।’
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, ४.१२.२००८)

‘मोडणारे कायदे तुम्ही केले। आता कितीही कायदे केले, तरी स्त्री अधिकाधिक असुरक्षित होईल. `स्त्रीच आपले रक्षण करू शकते. पुरुष तेथे हतबल आहे.’ (मनुस्मृती ९.१२) हिंदु कोडबिलाने स्त्री-जीवन उद्ध्वस्त केले, आमच्या गृहिणींचा, विवाह-संस्था आणि कुटुंब-संस्था यांचा घात करून स्त्रीला रस्त्यावर आणले. मनूवर सगळ्यांचा भयंकर रोष आहे. आधुनिक पुरोगामी या स्त्री-वैफल्याच्या संदर्भात सांगतात की, अजूनही मनूची सत्ता या भरतखंडावर अबाधित आहे.’
- गुरुदेव डॉ। काटेस्वामीजी (नारायणानंदनाथ) स्त्री धर्म - ४

*******************************************************************

मीना : आम्हाला प्रवासाचे स्वातंत्र्य हवे, साहस (Adventure) हवे. मी पहाड चढण्याचा सराव (mountaineering) करण्याकरता वेडी झाली आहे. मला मुक्त जीवन हवे.’
गुरुदेव : म्हणजे रानटी (wild) व्हायचे. रानटी जीवन (wild life) जगायचे, असेच ना ?
मीना : हं !
गुरुदेव : बंधनं नकोत, मर्यादा नकोत.
मीना : हं.
गुरुदेव : पृथ्वी, सूर्य, चंद्र, ग्रहमाला, सागर हे सगळेच जंगली (wild) झाले तर ? सागर उधळला, ग्रहमाला पृथ्वीवर सप्ताहशेषा (weekend) करता आली तर ? सागराने अवकाशयाना (Space Craft) सारखे आकाशात उड्डाण केले तर ?’’ (कुणीच बोलत नाही.)
गुरुदेव : जो मर्यादा सांभाळतो, तोच मुक्त जीवन जगू शकतो. मनमानी करणारा स्वैराचारी कधीच स्वतंत्रतेचे सुख भोगू शकत नाहीत. संयम पाळायचा आहे, मर्यादा राखायची आहे, वेशभूषा आणि केशभूषा यांतही मर्यादा राखली पाहिजे. पशूदेखील मर्यादा पाळतात आणि आम्ही.....’’
एक युवती : महाविद्यालयातील मुली आजकाल बांगड्या घालीत नाहीत.’’
गुरुदेव : का बरं ?
एक युवती : आम्ही घालणार नाही.
गुरुदेव : कारण ?
एक युवती : मुले कुठे घालतात बांगड्या ? आम्ही काही मुलांपेक्षा कमी नाही.
गुरुदेव : मुलांना मिशी फुटते. तुम्हालाही ती यावी, असे वाटते का ?
मुली किंचाळतात ``शी ! शी ! अय्या !’
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, जुलै २००७)

No comments:

Post a Comment