आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Friday, November 19, 2010

विद्या व तपाने सर्व भूतांचा अंतरात्मा तृप्त होतो.


  • पुराणात कसलाहि दोष नाही. ते पूर्णतः निर्दोष आहेत.
  • पुराणात वेदाची प्रतिष्ठा आहे. पुराणातला कोणताही अंश वेदविरुद्ध नाही. वेद जसे परमात्म्याचे निःस्वास आहेत. तसेच पुराणे ही परमात्म्याचे निःश्वास आहेत. फक्त त्यात फरक इतकाच आहे की वेदांची आनुपूर्वी कधीच बदलत नाही. कल्पानुसार पुराणांची आनुपूर्ती बदलते. अर्थाचा आशय जसाच्या तसाच असतो.
योगार्थ
  • वेद, उपनिषदे, महाभारतादि घटना प्रसंगाच्या संदर्भात आधुनिक यौगिक अर्थ प्रतिपादन करतात. तोच अर्थ ग्रहण करावा अस सांगतात. नवे नवे योगिक अर्थ बसवितात. हा प्रमाद आहे.
  • योगापेक्षा रूढी, परंपरा अधिक बलवती असल्याचे शास्त्रे सांगतात. तो लौकिकार्थ वा रुढार्थ आहे. तो मुख्य. त्या रुढार्थाच्या पुष्टीकरता योगिक अर्थ अपेक्षित असतात. आधी रुढार्थ वा लौकिकार्थ, तो ग्रहण करण्याकरताच योगार्थ ! तस नसेल तर अनर्थ होतील 'गो' हा शब्द आहे. गाय शब्द उच्चारताच सास्नादि अशी गाय डोळ्यासमोर उभी राहाते. योगार्थ जर स्वीकारला तर लक्षणावृत्तींचा आश्रय घ्यावा लागतो. ते तर अत्यंत अनुचित आहे. योगिक अर्थ स्वीकारण्यात आणखी अनेक दोष आहेत. 'विश्वामित्र' वगैरे शब्दात यौगिक अर्थ असंभव आहेत.
  • पुराणांचे लक्षण,.....
व्यासादि मुनिप्रणीतं वेदार्थप्रकाशकं पंच लक्षणान्वित शास्त्र l
  • पुराणांची पंच लक्षणे कोणती?
१) प्रवृत्ती,
२) स्थिती,
३) संहार,
४) धर्म व
५) मोक्ष
पुराणे
  • पुराणांचा अभ्यास करूनही आधुनिकांना त्याचे मर्म कळत नाही. ते शंका कुशंकांनी व्याकूळ असतात. ते आस्थाशून्य असतात. स्वतःच्या दोषामुळेच त्यांचे पतन होते.
  • आम्ही सनातनी अद्वैती आहोत. ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या ची वाटचाल करणाराच्या हातून अधर्म घडतच नाही. घडूच शकत नाही. तो मत्सर ग्रस्त कसा होईल?
  • मनु सांगतात, - सर्वांचा शासक, अणूहूनही अणू, सुवर्णाभ- निर्विकार, बुद्धिगम्य तो परमपुरुष जाणणारा सर्वांना पंचभूतात्मक शरीरांनी व्यापून जन्म, वृद्धि, क्षय द्वारा नेहमी चक्राप्रमाणे फिरवणारा, समाहित होऊन सदस आत्म्यात सर्व काही पाहाणाराचे मन कधीच अधर्म करत नाही. करू शकत नाही.
  • अद्वैती महापुरुषात असुया, ईर्षा असे दोष असूच शकत नाहीत.
  • सर्व भूतात आत्म्याला आणि आत्म्यात सर्वभूतांना समान पाहाणारा, त्या ब्रह्मा वरच इहलोक परलोकादि चिंता सोपवून निश्चिंत असतात त्यामुळे त्यांना दोष स्पर्शूच शकत नाहीत.
  • पुराण श्रवण धर्मराज्याची स्थापना करण्याची पहिली पायरी आहे. धर्मो रक्षति रक्षितः l
  • धर्मानुसार वागताना देखिल विपत्ती का येतात? या विपत्ती देवाकडून येतात, तेव्हा तिच्या सुटण्याचे उपाय प्राप्त होतात. उपासकाला ते समजतात. विपत्तीत उत्साह व गुणांची परीक्षा करायची असते. परमात्मा भक्तांना संकटात आणून नंतर विपत्तीतून त्याचा उद्धार करतो. धर्मो रक्षति रक्षितः l हाच धर्म !
धर्म एव हतो हन्ति l
  • न आचरलेला धर्म त्याचा नाश करतो। असत्य, अशुचि, दुराचारी माणसावर आलेली संकटे, देवाकडून आलेले नाहीत. ते अनाचारामुळे आलेले असते. त्याची ईश्वर उपेक्षा करतो. त्याचे अधःपतन होते. उत्तरोतोत्तर तो खाली जातो. नष्ट होतो.
- प. पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाङमय पत्रिका (घनगर्जित)

Friday, November 12, 2010

मेरा देश महान



गुरूदेवांची अमृतवाणी ही चिरंतन टिकणारी आहे.
कारण मानवी जीविताचे रहस्य उकलून दाखविणारी ती आहे.
देशाची मान आणि कणा ताठ नसेल तर हिंदुस्थानला जागतिक महासत्ता बनून काय उपयोग?
ब्रिटीश गुलामगिरीचे जोखड झुगारून आम्ही जे स्वातंत्र्य मिळवले, ते का या स्वकीयांची व परकीय कंपन्यांची आर्थिक गुलामगीरी पत्करण्यासाठी?
मेकॉलेच्या काळापासून ब्रिटिशांचे भारता संबधीचे धोरण हे परकीय (पाखंडी Godless) शिक्षण देऊन हिंदुधर्म व संस्कृतिची हत्या करणे, हिंदूंना परंपरेने प्राप्त झालेला बौद्धिक वारसा नष्ट करणे आणि भारताचे सर्व प्रकारे युरोपियनिकरण करणे हे होते. त्यांत ते विलक्षण यशस्वी झालेत.
सावधान ! सावधान !!
पाश्चात्य संस्कृती व civilization च्या प्रभावाखाली असलेली आधुनिक त्या पाश्चात्य विचारांशी, भावनांशी, जीवन जगण्याच्या पद्धतीशी इतके एकरूप झालेला आहे की, त्यांच्याच अनुरोधाने तो विश्वाचा रचनेचा कार्यपद्धतीचा अर्थ लावीत आहे. आणि आमची सर्वच्या सर्व प्राचीन दर्शन शास्त्रे, तत्त्वप्रणाली, समाजशास्त्रे परंपरा यांना तुच्छ मानतो. त्याला विचार करता येत नाही. तो केवळ संकलन करून अर्थ लावू पाहातो आणि जीवन नरकमय बनवतो.
समाज जातिविना एकसंघ राहूच शकत नाही. हिंदु समाज जाति संघटित आहे. म्हणून बलवान आहे. जातिसंस्थेचा विध्वंस करणे म्हणजे हिंदु समाज रसातळाला नेणेच आहे.
भारताची दुर्दशा कोणी केली?
* भारतातली उदारमतवादी, निधर्मी, समाजवादी लोकशाहीची स्थापना !
* बुद्धीवाद व विज्ञान निष्ठांच प्रबोधन !
* उच्चार स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, अभिरुचि स्वातंत्र्य, भ्रष्टाचार स्वातंत्र्य, स्वैराचार स्वातंत्र्य !
* स्वातंत्र्याच्या ६० वर्षाची खंडीत भारताची विश्वातील सर्वाधिक अद्भूत गतिमानता !!
('मेरा देश महान' या पुस्तिकेतून)

Friday, November 5, 2010

आम्ही केव्हा जागणार?

  • १९३६ साली दिनोवास्का ही पोलिश युवती भारतात होती. ती लिहीते, ''कोणत्याही हिंदुच्या चेहेर्‍यावर द्वेषाचे चिन्ह आम्हाला कधीच दिसले नाही वा क्रोधाची पुसटशी रेषाही आढळली नाही. पश्चिमेत ही गोष्ट केवळ अशक्य.
  • आज पश्चिमी संस्कृतीच्या अंगीकरणाने इतिहासात कधी नव्हता इतका वैफल्यग्रस्त आणि दुःखी बनला आहे. नरकयातना देणार्‍या या विज्ञानयुगाच्या, Sophisticated संस्कृतीच्या संकल्पना, भारतीयावर बेगुमानपणे, जबरीने लादल्या गेल्या. विळख्यात अडकले आहे. सगळ्या संकल्पना वैदिकांची समग्र शास्त्रे मनु आदि स्मृतिकार यांच्यावरच मंडनात्मक स्वच्छ. स्पष्ट भाष्यच आहे.
  • आणखी ती सांगते, 'उपजतच करुणा आणि हृदयाची परम ऋजुता त्यांच्यात खरीखुरी बंधुता बंधुभाव निर्मिते. बंधुता, समानता आणि स्वातंत्र्याची बिरुदावली मिरावणार्‍या जगातील अन्य राष्ट्रात त्याचा अल्पांशहि अभावानेही आढळत नाही. हिंदु रक्तातच अखिल मानवाविषयी प्रेम आहे. बंधुता आहे. समानता आहे. परकिय केवळ दंभाचारी आहेत.'
  • प्रेडेरिक पिंकाट छातीठोकपणे निर्भय स्वच्छ वस्तुस्थिती सांगतो, ''समाजाला आणि विश्वाला शांति आणि सुख देणारे जे काही आहे, त्या सर्वांचेच हिंदूंनी एक पद्धतशीर शास्त्रच बनविले आहे. समाजरचना, समाजव्यवस्था वा सामाजिक बाबीसंबंधी हिंदुना काही सांगावे, शिकवावे असे आमच्याजवळ काहीच नाही.''
  • तो पिंकाट पुढे इशारा देतो, ''आज आमच्या पश्चिमी देशात जो काही निर्लज्ज, स्वैराचारी गोंधळ आहे, तसा निलाजरा बेगुमान, आसुरी गोंधळ, या हिंदु समाजातही होईल, जर आम्ही (पश्चिमेने) आमच्या आसुरी ओबडधोबड सुकल्पना या निरागस, निष्पाप हिंदूच्या गळी उतरवल्या तर, पश्चिमी प्रणाली, संकल्पना सरळ हिंदुचे अपरिमित अहित करतील.
  • पश्चिमी जीवनाची धारणी, धारणाच मुळी स्वार्थाची, लोभाची आहे. भोगसाधनाकरता तिथे गळेघोर स्पर्धा आहे. त्यामुळेच उपस्थ, जिव्हेच्या लालसा भडकवणारा (शमवणारा नव्हे) बेगुमान आसुरी गोंधळ आहे. प्रेडेरिक पिंकाट या प्रामाणिक तळमळीच्या शास्त्रज्ञाचा इशारा आम्हाला सावध करायला समर्थ नाही का? आमच्या निलाजरेपणाला तुलना नाही.
- प. पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाङमय पत्रिका (घनगर्जित)