आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Wednesday, July 28, 2010

सहस्रावधी पाश्चात्त्यांना पुरून उरलेला सनातन धर्म !

. अमेरिका आणि युरोप यांची तर विलक्षण वैज्ञानिक प्रगति झाली आहे; परंतु अजूनही शुचितेच्या साध्या गोष्टीही त्यांना ठाऊक नाहीत. ‘सॅनिटेशनच्या बाबतीत ते अशुचि आहेत. त्यांच्या शौचाला पाणी नसते, तर ते कागदाचा वापर करतात आणि सांगतात की, `तो निर्जंतुकीकरण केलेला (sterilized) कागद आहे.'
या विसाव्या शतकात इंग्रजाळलेले पुष्कळसे हिंदू, मात्र आज कागदाने ढुंगण पुसतात. गोर्यांपासून त्यांनी हा रानटीपणा उचलला आणि अभिमानाने सांगतात, `हा कागद रोगजंतूपासून अलिप्त राखणारा आहे।'

. उद्दाम, राक्षसी आणि महामूढ तामसी पाश्चात्त्यांनी आणि त्यांचे बूट चाटणार्या पुरोगाम्यांनी गेली दोन शतके आमच्या सनातन सत्याचा विध्वंस केला, तरीही सहस्रावधी पाश्चात्त्य हिंदु धर्माच्या सनातन तत्त्वांनी आर्किषले गेले.

. ‘उच्च जातीबद्दल इतरांचा मत्सर वाढेल’, हे म्हणणे विचित्र आहे. मत्सर हा मानवी गुण असल्यामुळे जेथे म्हणून कोणत्याही कारणाकरिता कमी-अधिक भाव असेल, तेथे मत्सर उत्पन्न होणारच. आजच्या जातीहीन समाजात `मत्सरहा गुण नष्ट झाला आहे काय ? अन्य राष्ट्रांतून श्रीमंतांनी (भांडवलदारांनी) मिळवलेली संपत्ती आपल्या खिशात कशी जाईल, याची चिंता खालचा वर्ग करतो. त्यात मत्सर नसतो, असे म्हणायचे आहे का ? अंतर्गत भांडणे माजवण्याची भीती घालून राष्ट्राकडून वाटेल तशी खंडणी उकळण्याचे प्रयत्न कामगार संघटना करतात, ते कशाकरिता ?

. मनु धर्मनिष्ठ आचरणाचे नियमच देतो. नैसर्गिक प्रवृत्तींना दडपून टाकायला, दाबून टाकायला मनु िंकवा कोणतेच धर्मशास्त्रकार सांगत नाहीत. कामवासना जबर असेल, त्याने शास्त्राप्रमाणे ब्रह्मचर्यानंतर गृहस्थाश्रम स्वीकारायचा. वासना नसेल, तर मनु ब्रह्मचर्याश्रमापासून एकदम संन्यास घ्यायलाही संमती देतो.
आश्रमव्यवस्था अशी आहे की, मनुष्य आपल्या नैर्सिगक वृत्तींवर विचारपूर्वक विजय मिळवू शकतो. म्हणूनच मनु सांगतो, ``धर्म सर्वाधिक प्रमाण असावा. विचाराने वागावे आणि धर्ममर्यादांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी.’’ मनु सहज प्रवृत्तीचे उदात्तीकरण करायला सांगतो. ‘हळूहळू विचारपूर्वक त्याचे नियंत्रण कमी कमी होईल’, अशा आचरणाचे वळण देतो. मैथुन धर्मसंमत म्हणजे विवाह पद्धतीने स्वीकारायचे. तिथेही धर्मनियम म्हणजे ब्रह्मचर्य आहेच. वासनांतून मुक्ती व्हावी, यांकरिता विवाह आहे. मनु हिंदु समाजाचा नियंत्रक आहे. मनु अशी आचारपद्धती देतो की, गर्भादान संस्कारापासून ते अंत्येष्टीपर्यंतचे जे संस्कार आहेत, ते क्रमाक्रमाने वासनामुक्त करणारे आहेत.
धर्मसंमत मैथुन हे महाफळ देणारे आहे’, असे मनु सांगतोच. धर्माचे नियंत्रण नसेल, तर प्रसंगी मैथुनप्रवृत्ती बलात्कारही घडवील. काम ही तर ईश्वराची विभूती आहे; पण समाजावर धर्माचे नियंत्रण नसेल, तर समाज वासनांच्या आहारी जाईल. स्वैराचारी होईल.
- प.पू. गुरुदेव ( डॉ.) काटेस्वामीजी

No comments:

Post a Comment