आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Sunday, September 26, 2010

जो हिंदुहितपर हात उठायेगा...!


आजची पश्चिमी जीवन धरणी आणि विज्ञानवाद, आजची औद्योगिक संस्कृती आत्मघातकी आहेत. ही जीवन प्रणाली पूर्णपणे अभारतीय आहे. भारताची, भारतीयांची अस्मिता पायदळी तुडवणारी आहे. भारतीय जीवनमूल्ये चिरडून टाकणारी आहे. भारताच्या समाजशास्त्रीयतेच्या ठिक-या उडवणारी आहे. आमच्यात धुरीणींनी, शासनाने त्यांचा अंगीकार करून आमच्या सत्वाचे, अस्मितेचे नरडेच आवळले आहे.

ही आत्मघातकी धारणा, ही अमानुषता अमानवीयतेला परतवून लावण्याची क्षमता केवळ रामायणाच्या चिंतन धारेत आहे. राष्ट्रीय एकात्मता, भावनात्मक ऐक्य, Emotional Integrity, अखंड, अविच्छिन्न, असाध्य राखण्याची, सुस्थिर ठेवण्याची शक्ती केवळ रामायणाचीच आहे. पश्चिमी प्रणालीने मानवाला आत्मवंचित केले आहे. आजचा तरुण उल्लू, थिल्लर, भोंगळपट बनविला आहे. पैसा हाच परमात्मा झाला आहे. Standard of Living, समाजवाद, Economic Development , कल्याणकारी शासन हे सगळे बिनबुडाचे Superficial अर्थशून्य, मूल्यहीन, फसव्या 'कल्पना' जगभर आणि भारतातही तरंगत्या फुग्यासारख्या सोडल्या आहेत. रशियन, अमेरिकन आणि पश्चिमी सडक्या प्रणालींना मूठमाती देणे ही आजच्या काळाची सर्वाधिक महत्त्वाची निकड आहे. आमच्या तरुणांत, तो तिरस्कार, ती गर्हणीयता उफाळून यायला हवी. हे घडले की शील, त्याग, तेजस्विता, आत्मनिर्भरता उफाळून येईल.

रामायणाची ही ताकद आहे. 'हा भारत माझा देश आहे, हे राष्ट्र माझे स्वतःचे आहे, याचा तिरस्कार तो माझा तिरस्कार, याच्या उणीवा तो माझा दोष, या राष्ट्राची थोरवी ते माझे मोठेपण, ही अतूट श्रद्धा, ही भावना रामायणाने सहस्रश: वर्षांपासून जोपासली आहे आणि पुढेही तशीच अखंड जोपासत राहील.

रामायण चिंतनाने हीच धारणा, हे श्रद्धा, व्यक्तीत, जाती - जमातीत, समाजात एकत्र विनासायास फोफावते. रामायण असे राष्ट्र ममत्व निर्माण करते, जोपासते, संबधित करते. त्यातच अनुशीलन, अनुमाप होणे, आजच्या काळाची प्राथमिक गरज आहे.

भारत अखंड, एकात्म राखणारी सहस्रश: वर्षांपासून गंगा ब्रह्मपुत्रेसारखी अखंड वाहणारी ही रामकथा आमच्या पाठीशी खडी आहे. ही भावना, ही श्रद्धा आमच्या युवकांच्या मानसांत दृढमूल झाली की आपला तरुण शीलवान संयमी, मर्यादा सांभाळणारा आणि कर्तव्यकठोर, प्रज्ञावान, तेज:पूंज, होईल. हां हां म्हणता भारताची अखंडता, तेजस्वीता, गुणवत्ता, प्रज्ञा जगासमोर सूर्यासारखी तळपेल. विश्वाचे गुरुत्व भारताकडे विनासायास येईल.

- .पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाङ्मय पत्रिका (साप्ताहिक सनातन चिंतन वर्ष ५ अंक ३२)

No comments:

Post a Comment