आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Sunday, July 10, 2011

कौटिलीय अर्थशास्त्र!


अर्थ’ म्हणजे काय ? ‘मनुष्याणां वृत्तिरर्थः ।’
- कौटिलीय अर्थशास्त्र,
अधिकरण १५, अध्याय १, सूत्र १’
अर्थ : ‘मानवाची जीविका’ हाच ‘अर्थ’ आहे.

‘मनुष्यवती भूमिरित्यर्थः ।’
अधिकरण १५, अध्याय १, सूत्र १
अर्थ : ‘जिथे मानव रहातो, ती भूमी ‘अर्थ’ आहे’

म्हणजे जीविका आणि भूमी हे दोन अर्थ झाले. अर्थ आणि भूमी दोनच मानवाला उपयोगी आहेत आणि त्याचाच उपभोग त्याला घेता येतो. वास्तविक उपजिविका आणि जगाचा व्यवहार अर्थाविना चालू शकतो का ? वास्तविक अर्थप्राप्तीकरता भारताचे ‘भूमी’ हेच प्रमुख साधन आहे. ‘भूमी’ म्हणजे ‘शेती’ अथवा ‘कृषी.’ श्रम करून धान्य पिकवण्याकरता भूमीचा उपयोग करायचा, हीच जीविका. शेती हीच जीविका. ‘भूमी म्हणजे कृषी’ हाच अर्थ झाला. मानवाची वसाहत असेल, तरच ती भूमी ‘अर्थ’ होऊन मनुष्यवती होईल. मानव श्रम करेल, तरच ती भोगवती होईल. प्राचीन, अर्वाचिन अर्थशास्त्री तेच सांगतात, म्हणजे भूमीला प्राधान्य देतात. ती भूमी कशी संपादन करायची ? तिचे पालन-पोषण कसे करायचे ? हे उपाय, ही साधने सांगणारे, जे शास्त्र तेच अर्थशास्त्र. चाणक्य (कौटिल्य) त्याला ‘अर्थशास्त्र’ म्हणतो.

कौटिल्य अर्थशास्त्रात सांगतो, ``ज्यामुळे माणसाचे माणूसपण सतत र्विधष्णू असावे, अशी त्याची अर्थनीती आहे.’’ आर्य चाणक्याचा (कौटिल्याचा) `अर्थशास्त्र’ ग्रंथ हा पाचवा वेद मानला जातो. ‘प्राचीन भारतीय अर्थशास्त्रच अपूर्ण आहे. तिथे सैद्धांतिक अपूर्णता आहे. ते केवळ धार्मिक, जुनाट व टाकाऊ आहे’, असे हे दुष्ट सैतान आवर्जुन सांगतात. केवढे आश्चर्य ! कौटिल्याचे अर्थशास्त्र आजच्या अर्थयुगाचा मुकूट, संस्कृत साहित्याचा अद्भुत कोश आहे, ज्यात दैहिक आणि पारलौकिक दोन्ही दृष्टींचा समन्वय आहे. आजपर्यंत असा कोणता पाश्चिमात्य लेखक आहे, ज्याने इहलोक म्हणजे सामाजिक, आर्थिक, व्यावहारिक बाबींचा आणि परलोक म्हणजे धार्मिक, आध्यात्मिक आणि नैतिक बाबींचा समन्वय साधून विशाल दृष्टीकोन मांडला आहे ? केवळ आचार्य कौटिल्यच तो समन्वय साधतात. भारतीय आर्थिक चिंतकांच्या परंपरेतील, विश्वातील एकमेव कौटिल्य आहेत. त्यांनीच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांच्या संदर्भात धर्माचे महत्त्व प्रतिपादिले आहे. कौटिल्यांचे चरणी आमचे सहस्त्र प्रणाम !
- प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

No comments:

Post a Comment