आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Saturday, July 16, 2011

चारही युगांतील धर्मस्थापना आणि आताच्या काळात ती करण्यासाठी करावयाचे विविध प्रयत्न


कृतयुग
कृतयुगामध्ये दक्षिणामूर्तींनी धर्मस्थापना केली. ती कशी केली ? गुरोस्तु मौनं व्याख्यानम्, शिष्यास्तु छिन्नसंशयः ।। गुरूंचे मौनच व्याख्यान होते. त्यांच्या मौनानेच शिष्यांच्या शंकांचे निवारण होत असे आणि ते धर्माप्रमाणे वागायचे.

त्रेतायुग
पुढे त्रेतायुगात धर्मस्थापनेकरता भगवान दत्तात्रेयांचा अवतार झाला. इथे दत्तात्रेयांना उपदेश करावा लागला. मौनाने काम भागेना; म्हणून दत्तात्रेयांनी उपदेश केला. त्या उपदेशाचा प्रभाव असा की, ती धर्मस्थापना झाली.
द्वापरयुग
पुढे द्वापरयुग आले. या युगामध्ये व्यासांनी धर्मस्थापनेकरता अवतार घेतला. आता या युगात व्यासांना ग्रंथरचना करावी लागली आणि उपदेशही करावा लागला. व्यासांनी ग्रंथरचना केली, वेदांची कांडे केली, महाभारत लिहिले, पुराणे लिहिली. त्यांनी ग्रंथरचना करून धर्मस्थापना केली.
कलियुग
पुढे कलियुग आले. मग शंकराचार्यांचा अवतार झाला. शंकराचार्यांना धर्मस्थापनेकरता ग्रंथ लिहावेच लागले. त्यांचे प्रस्थानत्रयी आहे, देवतांची स्तुती इत्यादी अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत; पण एवढ्याने भागले नाही. त्यांना समाजात जाऊन प्रचार आणि प्रसार करावा लागला. तीन वेळा पायी भारतभ्रमण करावे लागले. सगळ्या लोकांच्या भेटीगाठी घ्याव्या लागल्या. साम, दाम, दंड, भेद, उपेक्षा इत्यादी सगळ्या मार्गांचा अवलंब करावा लागला. या सगळ्या महान खटाटोपीनंतर निरनिराळी पिठे स्थापन करावी लागली. नंतरच धर्मस्थापना झाली.

कलियुग संपून आज पाच सहस्त्र वर्षे संपून गेलीत; म्हणून आज आपल्याला जे धर्मस्थापनेचे कार्य करायचे आहे, त्याकरता विचार तर करावाच लागेल. तसेच तो लोकांमध्ये टिकवावा लागेल. आपला ‘सनातन धर्म’ लोकांना समजावून सांगावा लागेल. अखंड मारा करावा लागेल. नाटके, काव्य, कथा-कादंबर्‍या, चित्रपट, काही दूरचित्रवाहिन्या इत्यादी जी काही प्रसारमाध्यमे आहेत, त्यांचा उपयोग करावा लागेल. सर्व बाजूंनी जमेल तसा, जमेल त्या प्रकारच्या साधनांचा, तसेच प्रसारमाध्यमांचा अवलंब करावा लागेल. तन, मन, धन वेचावे लागेल आणि सनातन हिंदु धर्माची जी यथार्थ बाजू आहे, यथार्थ धर्म आहे, तो लोकांना सांगावा लागेल. म्हणजे सतत ‘सनातन धर्म’ लोकांच्या कानावर जाईल, असे काही करावे लागेल. सहस्त्रो वृत्तपत्रे, नियतकालिके, चित्रपट आणि याव्यतिरिक्त व्याख्याने, प्रवचने अशा सगळ्या साधनांचा अवलंब करावा लागेल, तरच आपल्या धर्मस्थापनेचे कार्य होईल.’

‘या प्रचाराने काम कसे होते, ते बघा. एक उदाहरण सांगतो. ट रॉबर्टसन हा एक अमेरिकेतला माणूस आहे. याने तिथे दूरदर्शनवर एक मोठे व्याख्यान दिले. त्यात सांगितले, `‘सनातन हिंदु धर्म हा रानटी, जंगली आहे. बदमाष लोकांचा आहे. हे परलोक मानतात. ३३ कोटी देवांची पूजा करतात. पशू, पक्षी, साप यांची पूजा करतात इत्यादी. या लोकांना आपण इथे ठेवता कामा नये. आपल्या देशात हिंदू असतील, हिंदु धर्माचे आचरण करणारे असतील त्यांना बंदी घालावी.’ त्याने असे मोठे प्रभावी भाषण केले. गंमत अशी की `Hinduism Today’ म्हणून अमेरिकेत एक मोठे मासिक छापले जाते. हे मासिक आमचा ‘सनातन हिंदु धर्म’ यथार्थपणे दणदणीत सांगते. त्यांच्याद्वारे सनातन हिंदु धर्माची बाजू मांडली जाते. ते संमेलने भरवतात, प्रसार करतात. अमेरिकेत या मासिकाचा प्रचंड खप आहे. अमेरिकेत ते प्रभावी आहे. आम्हाला सांगायचे असे आहे की, या `Hinduism Today’ च्या प्रचारामुळे त्यांचा असा प्रभाव पडला की, या पॅट रॉबर्टसन साहेबाच्या भाषणाची लोकांनी उपेक्षा केली. समजा हे मासिक नसते, तर या अमेरिकेच्या जनतेने त्या रॉबर्टसनचे म्हणणे ग्राह्य धरले असते. मान्य केले असते. हिंदूंना निष्कारण बाहेर जावे लागले असते.’

- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक ‘सनातन चिंतन’, २८.४.२०११)

No comments:

Post a Comment