आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Monday, June 14, 2010

संस्कृत मृत भाषा आहे का?


संस्कृतचे जे विरोधक आहेत, ते बहुतांशी इंग्रजीचे पुरस्कर्ते आहेत. ते इंग्रजीला 'वर्गीकृत भाषा' असे म्हणायला तयार नाहीत. इंग्रजांनी आमच्यात जातीभेद पोसला, जातीद्वेष वाढवला. इंग्रजी भाषा आणि संस्कृती विषयी भारतीयांत विलक्षण आत्मीयता निर्माण केली. संस्कृत भाषेविषयी अनादर निर्माण केला. परिणामत: युरोप अमेरिकेत उदयाला आलेल्या औद्योगिक संस्कृतीचा भारतात विलक्षण प्रसार व प्रभाव निर्माण झाला.

दुर्दैव असे की स्वार्थाकरता देवधर्म आणि संस्कृतीचेही उपकरण म्हणून वापर करणारे सैतान या आधुनिक औद्योगिक संस्कृतीने निर्माण केले आहेत. मानवतेची बात सर्वत्र हवेवर तरंगते आहे. पण माणसाला माणसाचा आधार, असा व्यवहारही आज केवळ नितीशास्त्रांच्या ग्रंथात उरला नाही. या सर्व वस्तुस्थितीचे सखोल चिंतन करून, अनाग्रही बुद्धीने, विवेक करून आजच्या संस्कृती विद्वेषाला व विस्मरणाला, या धर्मग्लानीला आळा घालण्याचे उपाय आम्ही शोधण्याचे शिकस्त करायला पाहिजे. संस्कृत कमिशन समोर साक्ष देतांना सी.व्ही. रमण या विश्वविख्यात वैज्ञानिकाने संस्कृतची तुफान प्रशंसा केली. त्यांनी नि:संदिग्ध सांगितले, "संस्कृत हीच भारताची राष्ट्रभाषा झाली पाहिजे."

शिक्षणक्षेत्र, शासन क्षेत्र व शास्त्रीय क्षेत्र यांचे ऐश्वर्य संस्कृत या राष्ट्रभाषेतून प्रत्ययाला येते. संस्कृत ही राष्ट्रभाषा अपरिहार्य आहे. तिला पर्याय नाही.
भारताची ज्वलंत अस्मिता, राष्ट्रीयत्व टिकवायचे असेल, विकसीत करायचे असेल, तर संस्कृतला शरण गेल्याविना गति नाही. संस्कृतविना आमचे राष्ट्र, आमचा इतिहास, आमच्या परंपरा जिवंत राहू शकणार नाहीत. संस्कृतमध्ये काही उणीवा असल्या तरी राष्ट्रभाषा म्हणून तिचा स्वीकार करावाच लागेल .

टीका: "संस्कृत ही मृतभाषा आहे. याचा अर्थ तिला आजचे वैज्ञानिक व औद्योगिक प्रगतीशी जुळवून घेता यायचे नाही. तितकी ती व्यापक व परिणत होऊ शकत नाही."
खंडन: "..... हा तुमचा दुराग्रह भारताच्या संस्कृतीचे तुम्हाला रतीमात्र ज्ञान नाही."

इ.स. १८३८ चा विल्यम अडम यांच्या चौकशी समितीचा अहवाल.

बंगालचा शिक्षण विषयक तिसरा अहवाल आहे तो. त्यात स्वच्छ निर्देश आहेत की कलकत्ता, मिथीला, दक्षिण बिहार येथील पंडितांनी गणित यंत्र विज्ञान, ज्योतिर्गणित, नव्यनीतिशास्त्र, शेतकी, वाणिज्य, वास्तुशिल्पे, धरणे, पाटबंधारे, या विषयावरचे काही ग्रंथ संस्कृतात लिहिले आहेत. काही लिहून देण्याचे आश्वासन कमिशनला दिलेले आहे. विज्ञान व Industries यांना धारक व पोषक असे शेकडो संस्कृत ग्रंथ आहेत. भृगुसंहीतेसारखे विज्ञान व Industries वरचे अगणित प्रकाशित व अप्रकाशित ग्रंथ आहेत. भारद्वाजांचा Aeronautics वरचा तुटका फुटका ग्रंथ आज उपलब्ध आहे. तो एकच एक ग्रंथ विज्ञान, वास्तुशिल्प, Industries वगैरे विषयावरचे शास्त्रग्रंथ निर्माण करण्याची संस्कृत भाषेची अनंत आकाशातील झेप दाखवून देईल.

Industry and Science यांच्या अभिव्यक्तीला संस्कृत मारक आहे असे म्हणण्याचे दु:साहस करू नका!

प. पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाङमय पत्रिकार्जित (वर्ष ९ अंक ३ )

No comments:

Post a Comment