आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Saturday, December 11, 2010


स्वातंत्र्याला साठ वर्षे उलटून गेलेल्या या भारत भूमीच्या जनतेकडे आंम्ही पाहातो तेव्हा आंम्हाला आश्चर्याचा धक्काच बसतो. शेकडो आधुनिक कत्तलखान्यातून भारतात सर्रास गोहत्या होते आहे. गाय ही केवळ अर्थव्यवस्थेचा घटक म्हणून कोश वाड्मय व अन्यत्र लिहिल्या जाते. शिकविल्या जाते आहे. मनुस्मृति महामूर्ख म्हणून संबोधणाऱ्या विद्वानांची इथे चलती आहे. श्रीराम, श्रीकृष्णाची निंदा-नालस्ती करणार्‍या विद्वानांची इथे चलती आहे. शाळा कॉलेजातून संस्कृति विद्वेष पोसला जातो आहे. कुणाला कशाचेच काही वाटेनासे झाले आहे. ही शॉकप्रुफ अवस्था जगातले कोणतही संवेदनाक्षम मन ढवळून काढणारी आहे. अवदसा आहे.

अरे! या देशात शेंडीकरता हजारोंनी प्राणांचा होम केला आहे! गोरक्षणाकरता लक्षावधी माणसांनी आपल्या छातीचे कोट उभे केले आहेत. सोमनाथ मंदिर रक्षणाकरता ऐंशी सहस्त्र हिंदूनी आपल्या रक्ताचे सडे शिंपलेले आहे. जंगलातल्या वाघाला ताज्या रक्ताची चटक असते. त्यामुळे हवे ते करून तो मिळवू, अशी गुर्मी त्यांच्यात असते. प्राणिसंग्रहातल्या पिंजर्‍यात बंदीवान झालेल्या वाघाला मात्र बाहेर पडलो, तर जनावर मिळेल असे वाटतच नाही. त्यामुळे पुढ्यात येईल ते निमुटपणे खाण्याविना त्याला अन्य पर्याय उरत नाही. त्यांची मने मेलेली आणि मांसही मेलेले. मुदीड मनाचे आम्ही, आमची मने मेलेली आणि मांसही मेलेले. म्हणून तर गोमांस चवीने खाऊन, आमचे पाश्चात्याळलेले हिंदु गोहत्या बंदीची आंदोलने चालवतात. वाघासारखे आंम्ही आज त्यांचे शेळपट लाचार भेकड, झालो आहोत. आमची मने मेलेली आणि मांसही मेलेले. इंग्रजी छायेच्या पिंजर्‍यात आम्ही बंदीवान झालेले आहोत. पाश्चात्य छापाच्या हिंदु सुधारकाग्रणीनी स्वतः बरोबर आम्हालाही त्या पिंजर्‍यात कोंडले आहे.

विज्ञान व अधिभौतिक शास्त्रे कितीही वाढली तरी मानवाची अमृत तत्वाच्या, ज्ञानाकडील ही स्वाभाविक प्रवृत्ती कधीही कमी होणार नाही. आधिभौतिक शास्त्रे कितीही वृद्धींगत होवोत, सर्व आधिभौतिक सृष्टी विज्ञान, बगलेत मारून तत्वज्ञान नेहमीच त्यांच्या पुढे धाव घेत राहाणार.

***********************************

'वंदे मातरम' हे राष्ट्रगीत होईल, असा कॉंग्रेसने ठराव केला. १७ आक्टोंबर १९३७ ला मुस्लीम लीगने मुस्लीमांच्या भावना दुखवल्या गेल्यात, असा कांगावा केला. 'वंदे मातरम' या राष्ट्रगीताचा निषेध केला. पं. नेहरू हे काँग्रेसचे अध्यक्ष! काँग्रेस वर्किंग कमिटीने वंदे मातरम या गीताची पहिली दोन कडवीच गायली जातील असा ठराव केला. संस्कृतिद्वेष्ट्या उलट्या खोपडीची कार्यशैली पहा कशी मूर्खपणाची आहे. काँग्रेसचे ८० टक्के पेक्षा अधिक सदस्य वंदेमातरम हे राष्ट्रगीत झाले पाहिजे, या मताचे होते. परंतु नेहरूंनी त्या सर्वांना डावलून जन गण मन हे राष्ट्रगीत २४ जानेवारी १९५० ला जाहीर केले. म्हणजे २६ जानेवारी हा गणराज्य दिन ! त्या आधी दोन दिवस त्यांनी तसे घोषित केले आमच्या राष्ट्रीय चळवळीचा हा भयंकर अपमान होता. जगात असे कोणते स्वतंत्र राष्ट्र आहे की पार्लमेंट मध्ये त्या देशाचे राष्ट्रगीत गायला सभासदांना बंदी आहे? काही मुस्लीम सभासदांनी निषेध केल्यामुळे पार्लमेंटमध्ये वंदे मातरम हे राष्ट्रगीत गाण्याला बंदी होती.

- गुरुदेव डायरीतून

No comments:

Post a Comment