आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Sunday, December 5, 2010

अध्यास भाष्य!


ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिण्या आधी आचार्यांनी अध्यास भाष्य लिहिले. त्यात त्यांनी अध्यासाचे नेमके स्वरूप सांगितले. अध्यास म्हणजे काय? तो अध्यास कसा होतो. ते सांगितले. या अध्यासाचे परिणाम कसे भीषण आहेत, त्याचे विवरण केले. तो दूर का केला पाहिजे. याचे विवरण केले. तो कसा दूर करायचा ते दाखविले सांगितले.
अध्यास म्हणजे काय?
  • अध्यास म्हणजे अविद्या वा अज्ञान. असा अर्थ आहे. आचार्यांनी तोच अर्थ सांगितला आहे. शांकर भाष्यावर लिहिणाऱ्या थोर आचार्यांनी त्यात सूक्ष्म भेद केला आहे. सूक्ष्म छटा तिथे आहेत. शंकरांनी मात्र तसा काही फरक केला नाही. आमच्या बुद्धीचे समाधान होईल असे अध्यास भाष्य आहे.
अध्यासो नाम अनास्मिन तदबुद्धिः l
  • असे अध्यासभाष्यत विवरण आहे.
  • पूर्वी पाहिलेल्या एखाद्या गोष्टीची दुस-यावर भ्रांति होणे म्हणजे अध्यास ! असते शिंपी परंतु भ्रांति होते रजताची. असते दोरी परंतु भ्रांति होते सर्पाची (रज्जुसर्प). असते वाळू परंतु भ्रांति होते जलाची (मृगजळ).
  • शिंपी ही वास्तविक शिंपी असताना अज्ञानाने त्यावर चांदीची मिथ्या भ्रांति होते. या भ्रांति वा भ्रमालाच अविद्या म्हणतात.

अविद्या-अज्ञान-माया-अध्यास
  • ही अविद्या वा माया नकारात्मक नाही. अभावस्वरूप नाही. ती भावरूप आहे. तिला अस्तित्व आहे. ती प्रत्यक्ष जाणीव आहे.
  • शंकरांचा केवलाद्वैत सिद्धांत आहे. यात अविद्या अथवा अज्ञान वा अध्यास या संकल्पनेला फार महत्व आहे. शंकरांचा केवलाद्वैत विचार या अध्यासाभोवती फिरतो. अध्यास म्हणजे काय ज्याला नेमके कळते, त्यांना अद्वैत वेदांत कळू शकतो.
  • ही माया (वा अविद्या) परमेश्वराची एक महाशक्ती आहे. ही मायाशक्तीच परमेश्वराला नानाविध रुपात प्रकट करते. या मायेच्या आवरणामुळे जीवाला स्वतःचे आत्मस्वरूप जाणता येत नाही आणि तो जन्ममृत्यूच्या चक्रात अडकतो.
  • हा 'अध्यास' दूर करणे हेच मानवी जीवनाचे अंतिम आहे.
  • वास्तविक एकमेवाद्वितीय ब्रह्म असताना अध्यासाने वा मायेने भेद दिसतात, नानात्व दिसते. अनेकत्व दिसते.
  • ही जी अविद्या वा माया वा अध्यास आहे. ती अस्तित्व असलेली जाणीव असली तरी ती पूर्ण सत्य नाही इतकेच. तसेच ती पूर्ण असत्यही नाही. कारण अध्यास वा मायेचे परिणाम अनुभवाला येतात म्हणून अध्यास वा माया सत नाही. असत नाही. सद्सत नाही. तर ती अनिर्वचनीय आहे.
  • शंकर या मायेले 'सद्सद अनिर्वचनीया म्हणतात. तिच निरुपण अशक्य आहे.
अध्यास - मायेचे परिणाम काय होतात?
  • सृष्टीतील सर्व पदार्थाचे वर्गीकरण शंकर स्थूलमानाने दोन वर्गात करतात.
१) युष्यद प्रत्यय गोचर आणि २) अस्मद प्रत्यगोचर,
  • दोन्ही वर्गातील पदार्थ परस्पराहून अत्यंत भिन्न असताना अध्यासामुळे आपण त्यांचा एक दुसऱ्यावर आरोप करतो आणि त्यातूनच लोकव्यवहार सुरु होतो.
युम्यद - अस्मद - प्रत्यय - गोचरयोः l
तमः प्रकाशवत विरुद्ध स्वभावयोः l
सत्यानृते मिथुनीकृत्य अहमिदं ममेरम इति l

हा जो सत्यानृताचा लोकव्यवहार आहे, तो मिथ्याप्रत्यय रूप आहे. अध्यासामुळे जीव हा उपाधीशी एकरूप होऊन कर्ता, दुःखी व जन्ममृत्यूच्या फे-यात अडकणारा जीव होतो. द्वैतात अडकतो.
वास्तविक आत्मा निर्गुण निराकार, अकर्ता, अभोक्ता असताना अध्यासामुळे सगुण साकार कर्ता, भोक्ता होतो. तो कसा?
  • अध्यासामुळे ब्राह्मधर्म (पुत्र, पिता, बंधु) इंद्रियधर्म (अंध आणि पंगु) अंतःकरण धर्म (बुद्धि, इच्छा) यांचा निर्गुण निराकार। निष्काम आत्म्यावर अध्यारोप करतो. म्हणून तो जीवात्मा कर्ता, भोक्ता होतो.
- प. पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाङमय पत्रिका (घनगर्जित)

No comments:

Post a Comment